*कोंकण Express*
*राजापूरच्या गंगेचे आगमन!*
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचं सहा महिन्यांनी पुन्हा एकदा आगमन झालं आहे. मुख्य काशिकुंडासह चौदाही कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं आहेकडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.