जिल्ह्यात टोलनाक्याबाबत प्रशासनाने भूमिका जाहीर करावी

जिल्ह्यात टोलनाक्याबाबत प्रशासनाने भूमिका जाहीर करावी

*कोकण Express*

*जिल्ह्यात टोलनाक्याबाबत प्रशासनाने भूमिका जाहीर करावी…*

टोल वसुलीला विरोध; जिल्हा मनसेकडून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२९:*

जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर बसविण्यात येणाऱ्या टोलनाक्याबाबत शासनाने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज पवार यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान या ठिकाणी होणाऱ्या टोल वसुलीला आमचा तीव्र विरोध आहेत. मनसे या विरोधात नक्कीच आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.यात असे म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या नियमानुसार ८० टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल आकारणी सुरू होऊ शकते. या अनुषंगाने या हायवेचे काम अंतिम टप्प्यात आहे.तरी टोल विषयी शासनाचे धोरण जाहीर करण्यात यावे, सिंधुदुर्ग वासियांना या टोल वसुली मध्ये सूट मिळावी,अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी आहे.शासनाने याबाबत निश्चित धोरण जाहीर करावे, जिल्हावासीयांना टोल सक्ती केल्यास विविध व्यावसायिक स्थानिक नागरिक व मनसे टोल विरोधात जनआंदोलन उभारेल याची नोंद घ्यावी.याबाबत धोरण प्रसिद्ध करावे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर,उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुका सचिव विठ्ठल गावडे, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, रुपेश पांगम,सुनील सोनार, अमित घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!