*कोंकण Express*
*कणकवलीसह जिल्यातील नळपाणी योजना व्हेन्टिलेटरवर*
*नव्याने आराखडा करून योजना कार्यान्वित करणे अत्यावश्यक – भाई चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्यातील ८ तालुक्यांतील शहरे, नगर पंचायत, नगरपालिका आणि पंचक्रोशीतील नळपाणी योजनांची अमंलबजावणी ४० वर्षांपूर्वी बहुतांशी ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या ४० वर्षांतील शहरीकरणामुळे या नळ योजनांच्या भुमिगत पाईप लाईन वर रस्ते, घरे बांधण्यात आली .त्यामुळे या पाईप लाईन जमीनीत खोलवर गाडल्या गेल्याने पाणी पुरवठा बंद झाल्यास दुरुस्तीची कामे करणे जिकिरीचे झाले आहे. या योजना व्हेनिलेटवर असून कणकवलीसह सर्वत्रच नव्याने आराखडा करून या योजना नव्याने कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
कणकवलीतील टेंबवाडीत अलिकडे दोन ठिकाणी काही जणांचा पाणी पुरवठा बंद झाला होता. दोन्ही ठिकाणी नगर पंचायतीच्या कर्मचार्यांना सुमारे तीन फुटांपर्यंत खोदाई करावी लागली. एका ठिकाणी तर डांबरीकरणाचे थर फोडून दुरूस्ती करावी लागली. कणकवली शहरासह अन्य शहरांत, गावांत हिच परिस्थिती आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी अलिकडेच सावंतवाडी नगर परिषदेसाठी ८ कोटी रुपये खर्चाची नव्याने पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरे, गावांतील नळपाणी योजना नव्याने कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे.