*आज ‘गांव चलो’ अभियानाच्या निमित्ताने मा. आम. प्रमोद जठार यांची फोंडाघाट गांगोवाडी येथे भेट

*आज ‘गांव चलो’ अभियानाच्या निमित्ताने मा. आम. प्रमोद जठार यांची फोंडाघाट गांगोवाडी येथे भेट

*कोंकण Express*

*आज ‘गांव चलो’ अभियानाच्या निमित्ताने मा. आम. प्रमोद जठार यांची फोंडाघाट गांगोवाडी येथे भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

▪️कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गांगोवाडी येथे भाजपा नेते, मा. आमदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांनी भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

▪️“भारतीय जनता पार्टी इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष असून राष्ट्रहितैषी विचारसरणीचा पुरस्कार आणि अंत्योदयाचे ध्येय घेऊन भाजपाने आजवर वाटचाल केली आहे. मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली देशाची सेना अधिक सशक्त झाली आहे. अर्थव्यवस्था बळकट होत असून गतीने प्रगती होत आहे” अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. “राममंदिर हा सकाळ हिंदू समुदायाचा आस्थेचा विषय. या प्रकरणात राजकीय बळाचा वापर न करता सौहार्दपूर्ण रीतीने हा प्रश्न सोडवण्याचे काम याच सरकारच्या काळात झाले. व्यापार, पर्यटन, उद्योग आदी क्षेत्रांत भारताने मागील १० वर्षांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा ही अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ भाजपाच्या मुशीतून पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनतेने निर्धार करून भाकरी परतवा नाहीतर कोकणाचा विकास करपल्यास दुसऱ्या कोणाला दोष देऊ शकत नाही.” असेही ते म्हणाले.

▪️यावेळी कार्यकर्त्यांसोबत उत्साहपूर्ण वातावरणात पक्षाचे विविध उपक्रम राबवत, चर्चा करत एकंदर राजकीय स्थितीचे अवलोकन त्यांनी केले. त्यांच्यासोबत गांगोवाडी येथे आलेले प्रवासी कार्यकर्ते श्री. मनोज रावराणे, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. गजानन सावंत, बूथ प्रमुख श्री. रूपेश चव्हाण, श्री. बबलू सावंत तसेच अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!