उध्दव ठाकरे पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत,महायुतीत घेण्यासाठी भाजपचे उंबरठे झिजवत आहेत

उध्दव ठाकरे पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत,महायुतीत घेण्यासाठी भाजपचे उंबरठे झिजवत आहेत

*कोंकण Express*

*उध्दव ठाकरे पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत,महायुतीत घेण्यासाठी भाजपचे उंबरठे झिजवत आहेत*

*भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केला दावा*

*म्हणूनच कोकण दौऱ्यात मोदींच कौतुक,वंदे भारत ट्रेन ने केला प्रवास*

*महाविकास आघाडीच्या काळात गुंडांना कोण घेऊन फिरत होत ह्याचा अल्बम देतो*

*८० कोटी लोकांना फुकट धान्य मोदी साहेबांनी दिले त्याला खिचडी चोरांचा विरोध*

*आमदार राणे यांनी राऊत यांना सुनावले*

*कणकवली ः प्रतिनिधी*

संजय राऊत याचा मालक उध्दव ठाकरे पूर्ण कोकण दौऱ्यात मोदींच कौतुक करत होता.उद्धव ठाकरे इंडी आघाडी सोडून भाजप मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे.ते पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत आहेत.त्यासाठी पंतप्रधान मोदी साहेब,अमित भाई शहा यांना दिल्लीत भेटण्यासाठी,पायावर डोक ठेवण्यासाठी भाजपचे उंबरठे झिजवत आहेत.मोदींनी सुरू केलेल्या वंदे भारत ट्रेन मधून कोकणातून मुंबई ला जाण्याचे प्रयोजन याचे सुद्धा तेच कारण आहे. मी सांगतो ते खोटे असेल तर उध्दव ठाकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांची खरी शपथ घ्यावी आणि महाराष्ट्राला व मित्र पक्षांना आघाडी सोडणार की नाही याची खरी माहिती द्यावी असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि ठाकरे यांचा समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून भाजपासोबत येण्यासाठी आतुर आहे की नाही ते सांगावं. असे सांगताना नेहरूंनी देशाला आळशी कस बनवलं ह्याच उत्तम विश्लेषण पंतप्रधान मोदींनी केले. त्या मिरच्या काँग्रेस च्या कामगार असलेल्या संजय राऊत ला झोबल्या म्हणून टीका करतो अग्रलेख लिहितो. पण तुझा मालक व मालकीण वंदे भारत ट्रेन ने मुंबईला गेले ती मोदींजींची देन आहे.त्यांना मोदींचे कौतुक वाटते.त्यामुळे राऊत च्या टीका टिपण्णीला त्याचा मालक,मालकीण भीक घालत नाहीत हेच यातून दिसून आले.
तुझा मालक,त्यांची पोर व तुझे गुंडासोबतचे हनिमून चे फोटो आम्ही व्हायरल करतो.किंवा वेब सिरीज काढतो म्हणजे कळेल निलेश पराडकर व संजय राऊत यांचा काय संबंध, ह्याच पण उत्तर द्याव. महाविकास आघाडीच्या काळात गुंडांना कोण घेऊन फिरत होत ह्याचा अल्बम आम्ही दाखवतो.
८० कोटी लोकांना फुकट धान्य मोदी साहेबांनी दिले ते गोर गरिबांसाठी दिले.मोदी गोर गरिबांना मदत करणारे आहे. राऊत यांचे कुटुंब गरिबांची खिचडी खाणारे नाहीत.
मागील 10 वर्षे नोकऱ्या देण्याचं काम मोदी सरकार करत आहे. मात्र राऊत ने मुलीला वाईन कंपनी आणि आदित्य,तेजस ठाकरे यांना कंपनी यापलीकडे कोणाचा विचार उबाठा सेनेने केला नाही.तुझ्या सारख कुटुंबाचा विचार मोदी साहेब करत नाही ते देशाचा विचार करत आहेत. तुझ्या सारखी खिचडी चोरी मोदींनी नाही केली. गरिबांना अन्न दिलं.त्याला तुम्ही विरोध करता हे दुर्देवी आहे.महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. त्यामुळे उबाठाला जागा वाटपात कशी भीक दिली जाते ते समजेल.
काही दिवसा अगोदर मालेगाव शहरात 300 कोटी पेक्षा जास्त वीज चोरीचे सत्य मी मांडले होते. त्या वेळी आमची बैठक झाली होती. आता अभिमानाने मी सांगतो त्या बैठकीचे पडसाद मालेगाव मध्ये पाहायला मिळत आहेत. मालेगाव मिनी पाकिस्तान म्हणण्याची वेळ का आली. ह्याचा पुरावा मी दिलाय. तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा होत असेल. तो असिफ शेख माजी आमदार आहे की पाकिस्तान चा एजंट आहे.आम्ही मालेगाव ला पाकिस्तान होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यात मी चुकीचं बोललो नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही. कायदेशीर उत्तर देईन असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांना सरकार बदललं ह्याची माहिती नसेल. सकाळी उठून कडक चहा घ्या आणि शुद्धीवर या.रोहित पवार हा पवार गटाचा पप्पू आहे.अशी टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!