*कोंकण Express*
*मतदार जागृत राहिला तर लोकशाहीत जिवंत राहील*
*डॉ.सतीश कामत फोंडाघाट*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये राष्ट्रीय मतदार दिन संपन्न झाला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभगा मार्फत या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की लोकशाहीत मतदारांना खूप मोठे स्थान आहे. मतदार आपल्या पसंतीचे सरकार निवडून आणू शकते. त्याचबरोबर आपला विरोधात गुप्त ठेवू शकते. ही लोकशाहीची ताकद आहे. मतदार जागृत राहिला तरच लोकशाही जिवंत राहील. आपला राजकारभारात चालवणाऱ्याला निवडून आपण मतदार देत असतो. जे मतदान करतो ते सजगपणे व डोळसपणे केले पाहिजे. आपल्या अधिकाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे. या अधिकाराचे पावित्र्य ठेवण्याची ताकद आपल्यात आहे. त्या लोकशाहीमुळे सरकारवर सर्व सामान्यांचा वचक राहतो. असे प्रतिपादन केले.
आपल्या प्रस्तावितकामध्ये डॉ. संतोष रायबोले म्हणाले की जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा भारत देश आहे परंतु मताधिकाराबाबत आपली असणारी अनास्था ही धोकादायक आहे. त्याच्या जनजागृतीसाठी या मतदार दिनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम म्हणजे आपले काम संपत नाही तर आपण आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे आणि प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रबोधित केले पाहिजे. असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत ज्याची मतदार कार्ड आली त्यांना मतदार कार्ड देऊन त्यांच्या अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर मतदानाची शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. कीर्ती पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.