*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षकांच्या रत्नागिरीत करण्यात आल्या बदल्या…*
*लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली बदली*
*सिंधुदुर्ग*
वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव,कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव,वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे याची लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आली रत्नागिरीत बदली करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षकांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशाने ही बदली करण्यात आलेली आहे.