जीवनाचा ब्रेक उत्तम असला तर जीवन समृद्ध बनते ; सौ.रिझवाना नदाफ

जीवनाचा ब्रेक उत्तम असला तर जीवन समृद्ध बनते ; सौ.रिझवाना नदाफ

*कोंकण Express*

*जीवनाचा ब्रेक उत्तम असला तर जीवन समृद्ध बनते ; सौ.रिझवाना नदाफ*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये महाविद्यालयाच्या एनएसएस विभागामार्फत पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सौ. रिजवाना नदाफ उपस्थित होत्या. त्याचबरोबर हेडकॉन्स्टेबल श्री. प्रकाश गवस, श्री. आशीष जाधव, श्री. सुनील निकम, होंडा घाट पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सावंत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी केले.

आपल्या मनोगतात फोंडाघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संजय सावंत म्हणाले की, पोलीस हा पेशा भीती वाटण्यासारखा नाही. तो आपल्या रक्षणासाठी असतो. आपल्याला सहकार्य करण्यासाठी असतो. आपली काळजी घेत असतो. ६१ वर्षांपूर्वी जे आपल्याला यंत्रणा मिळाली ती निश्चितच आपल्याला सहकार्य करण्यासाठी आहे. असे मत व्यक्त केले.

हेड कॉन्स्टेबल श्री. प्रकाश गवस म्हणाले की प्रत्येक नागरिकाची नजर ही पोलिसी असली पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येक सिविल ड्रेस मधला माणूस हा पोलिसच असतो. संशयास्पद गोष्टीची माहिती आपण पोलीस यंत्रणेला दिली पाहिजे. एखादा गुन्हेगार आपल्यामुळे सापडला तर पोलीस यंत्रणाला यंत्रणेला सहकारी मिळेल आणि त्याचा फायदा आपल्यालाच भविष्यातील आयुष्यामध्ये होईल किंबहुना पोलीस भरतीच्या वेळी या सर्टिफिकेटचा उपयोग होऊ शकतो.

पोलीस निरीक्षक सौ. रिजवाना नदाफ म्हणाल्या की कायद्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. कायद्याची माहिती हीच कायद्याची पाळणूक असते. आजकाल ऐकण्याची सवय नसली तरी आपल्या फायद्याचे ऐकले पाहिजे. हे आपल्याला हिताचे असते. स्वसंरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला व्यायामाची आवश्यकता असते. चित्रपट पाहून मन भरकटवून घेऊ नका. मोबाईल सारख्या गोष्टीतून क्षणिक सुखासाठी जीवन बरबाद करणारी पिढी निर्माण झाली आहे. करिअर घडवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. एकदा मार्ग चुकला तर जीवनाची गाडी रुळावर येण्यास खूप वेळ लागतो. भावनांना आवर घालणं हे स्वतःवर अवलंबून आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघा. स्पर्धा परीक्षेत झोपून द्या आणि आपले करिअर घडवा. शरीर संपदा ही आपला ठेवा आहे. वाहने जबाबदारीने चालवा. एखादा अपघात झाला आणि अपघातात आपला अवयव गमावला तर त्याची जबर किंमत मोजावी लागते. स्वतःची ओळख स्वतः बनवा. असे प्रतिपादन केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की पोलीस हे मित्र आहेत हे या मान्यवरांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले. एक महिला अधिकारी आपले कर्तव्य बजावताना सावित्रीमाईचा आदर्श ठेवून आपली शिकण्याची जिद्द दाखवून देते हे अभिमानास्पद आहे. आपले जीवन फिल्मी असता कामा नये. मोबाईलच्या किड्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. पुस्तकाकडे वळलेली पिढी सक्षम बनेल. असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!