*कोकण Express*
*कसाल येथे रेल्वे स्टेशन होण्यासाठी २२ गावांचे ग्रामस्थ एकवटले….*
*मंजूरी मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्णय; संघर्ष समितीची स्थापना….*
*ओरोस : प्रतिनिधी*
कसाल येथे जोपर्यंत रेल्वे स्टेशन मंजूर होत नाही तोपर्यंत संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा आज येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत अध्यक्ष संतोष उर्फ बाळा कांदळकर यांनी दिला आहे. या ठिकाणी कोकण रेल्वेच्या माध्यमातून झालेला पहिल्या सर्वेत कसाल येथे रेल्वे स्टेशन होते. परंतु त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे आता कसाल मध्ये रेल्वे स्टेशन व्हावे वासाठी परिसरातील २३ गावातील ठराव दिले आहे.
या समितीवर अध्यक्ष म्हणून संतोष (बाळा) कांदळकर, उपाध्यक्ष संजय वाडकर, सचिव साईनाथ आबेरकर, खजिनदार गणपत कसालकर, सदस्य निलेश कामतेकर, मिलिंद सावंत, कृष्णा आंबेरकर, चिन्मय पावसकर, देवेंद्र तेली, संदिप सातार्डेकर, देवेंद्र कसालकर, सौ. सुलभा परब, गौरी पाताडे तर सल्लागार म्हणून कसाल सरपंच राजन परब, अवधूत मालणकर, नवीन बांदेकर, मधुकर राणे, गोपाळ हरमलकर, उमाकांत पालव, लवू म्हाडेश्वर, विनोद परब, रविद्र गावडे, महेश बांदेकर, आत्माराम परब, सायमन फर्नांडिस, नारायण आचरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अवधुत मालणकर, उपसरपंच शंकर परब, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसाल गाव हा मुंबई गोवा या महामार्गावर असून या ठिकाणी रेल्वे स्टेशन झाल्यास त्याचा उपयोग जिल्ह्यातील सर्व रेल्वे प्रवाशांना व नागरिकांना होणार आहे. यासाठी कसाल सह आजूबाजूच्या सुमारे २२ गावांनी ग्रामसभेचे ठरावही संमत केले आहेत. या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी गेले तीस वर्ष प्रयत्न सुरू आहेत, तरी अद्याप त्याला यश मिळालेले नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन होण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न व्हावेत. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा उभारला जाणार आहे. या बैठकीत रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी करावे लागणारे प्रयत्न याबाबतची रूपरेषा निश्चित करण्यात आली आणि जो पर्यंत आपल्याला यश मिळत नाही. तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा तसेच हा लढा अधिक तीव्र करण्याचा निश्चय करण्यात आला.