सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चा सातबारा ठाकरे स्वतःच्या नावावर करण्याच्या प्रयत्नात होते ;आमदार नितेश राणे

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चा सातबारा ठाकरे स्वतःच्या नावावर करण्याच्या प्रयत्नात होते ;आमदार नितेश राणे

*कोंकण Express*

*सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चा सातबारा ठाकरे स्वतःच्या नावावर करण्याच्या प्रयत्नात होते ;आमदार नितेश राणे*

*संजय राऊत यांनी प्रथम या विषयी बोलावे…*

* हा प्रकार ७/१२ स्वतःच्या नावे करण्याचाच होता, आमदार राणे यांचा घणाघात*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चा सातबारा आदेश बांदेकर च्या माध्यमातून स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रथम बोलावे.कोरोना काळात फक्त ठाकरे व पाटणकर कुटुंब यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन सुरू ठेवून.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती पूजेसाठी सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी ११ दिवस ठेवले होते.सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी वाटली का अशा खरमरीत शब्दात भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी राऊत आणि उबाठा सेनेचा काम समाचार घेतला.राम मंदिर कार्यक्रमाला बोलवलं नाही म्हणून थयथयाट करणे राऊत याने थांबवावे. संजय राऊत ज्या पद्धतीने प्रभू श्री राम यांच्या बद्दल अपशब्द उच्चारत आहे अशा पापी वेक्तीना तेथे प्रभू श्री राम यांनीच प्रवेश नाकाराला आहे. असे आमदार नितेश राणे म्हणाले.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. नितेश राणे म्हणाले,आमंत्रणावर आम्ही राजकारण केले नसल्याचे संजय राऊत म्हणाला. राऊत चा गजनी झाला आहे ? असा सवाल करत जोरदार टीका केली.यापूर्वी मेट्रो, बाळासाहेब स्मारक भूमिपूजना अशा कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस यांना का डावलल ? मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी या कामांना गती दिली होती आणि मंजूर सुद्धा केली होती.
कोणाला अयोध्येला बोलवाव हे प्रभू श्रीराम देवतेने ठरविले आहे. तुमच्या सारख्या पापी,आणि जिहादी लोकांना बोलवलं नाही.राहुल गांधीचा पुन्हा एकदा फ्लॉप शो. सुरू होतोय तिकडे तुम्ही जा. कारण जेथे राहुल गांधींची यात्रा जाणार तेथे काँग्रेस पराभूत होणार आहे. त्यांच्या इंडी ला सुद्धा यश मिळणार नाही.
मणिपूर ते मुंबई भागात काँग्रेस चा पराभव निश्चित आहे.संजय राऊत चा घाम कुठे कुठे गळतो हे गोरेगाव रॉयल फार्म वरील कामगारांना विचारावा लागेल. उद्धव ठाकरेचा घाम कधी गळतो हा संशोधनाचा विषय आहे.ते नेहमी एसी मध्येच बसून असतात.
किडण्याप अशी खालच्या दर्जाची भाषा प्रभू श्री राम यांच्यासाठी संजय राऊत वापरत आहेत. आमच्या देवाला कोणीही किडण्याप करू शकत नाही. ५०० वर्षा पासून असलेली जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे. हे याच्या सारख्या मुल्लाला कळणार नाही.दुसऱ्यांच्या उद्योग समूहावर बोलण्यापेक्षा पाटणकर बाबत संजय राऊत ने एक अग्रलेख लिहावा.
बॉक्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज साहेब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक
राज साहेब ठाकरे हे सातत्याने सामाजिक विषय उचलत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज साहेब दोघांच्या भेटीने महाराष्ट्र राज्याच्या फायदा होईल. हे दोघेही नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीतून राज्याला फायदाच होईल असा विश्वास यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर आमदार बच्चू कडू यांच्या बद्दल बोलताना आमदार राणे म्हणाले कोणी ही त्यांच्या सोबत चहा पिली, बिर्याणी दिली तरी ते महायुती सोबतच राहणार. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारे आमचे सरकार आहे हे त्यांना माहीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!