*कोकण Express*
*तुमचे सरकार असताना मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा राजीनामा का दिला नाही*
*आमदार नीतेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल*
*राजीनामा देण्याची सुरवात मातोश्री वरून करा,कामगाराचा आधी राजीनामा घ्या*
*शिंदे,फडणवीस,अजित दादा यांच्या नेतृत्वात आमचे सरकार कायम टिकणारे मराठा आरक्षण देणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत.ह्याच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले. तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही. राजीनामा देण्याची तुमच्या घरातून सुरवात करा. तुम्ही राजीनामे द्या,तुमचा कामगार संजय राऊत ला राजीनामा द्यायला सांगा. तुमच्या उबाठा सेनेचे खासदार,आमदार शिल्लक आहेत त्यांचे राजीनामे घ्या आणि मग दुसऱ्यांचे राजीनामा द्यायला सांगा. तशी हिम्मत ठाकरे नी दाखवावी असे आव्हान भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले. कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
आज सकाळी संजय राऊत आजच्या सर्व पक्षीय बैठकीवर थयथयाट करताना दिसला.एका बाजूला घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजुला सरकारच्या बैठकीसाठी नाक रगडत फोटो साठी यायची इच्छा आहे.आजच्या बैठकीला ह्यांना बोलावलं नाही त्याबद्धल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो.
सर्व पक्षीय बैठकीत हाऊस किपिंग ची मानस आहेत. त्यामुळे राऊत अनिल परब यांचं काम नाही, त्याची गरज नाही .असा टोला सुद्धा लगावला.आमचं सरकार टिकणार आरक्षण देणार.जरांगे पाटीलांनी राजकीय भाषा सुरू केले आहे.त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गाल बोट लावू नये.
हिंसेला समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. जे दोषी नसतील त्यांनच्यावे कारवाई होणार नाही.याची खात्री देतो.कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू असशील नितेश राणे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःच चिन्ह, नाव आहे का? म्हणून चिरीमिरी लोकांना दंगल भडकवणाऱ्यांना सर्वपक्षीय बैठकीला बोलवलं नाही.असे सांगताना अंबादास दानवेना बोलवलं आहे. ते तुमच्या पक्षाचे नाहीत का ? 90 कमी मारावी मग समजेल असे संजय राऊत यांना सुनावले.मातोश्री च पण इंटरनेट बंद करा तिथूनच दंगली भडकविल्या जातात अशी मागणी केली.काड्या लावण्यात ज्याची phd झाली आहे. त्याने दुसऱ्याला काडेखोर म्हणू नये. राऊत यांनी काड्या लावण्याचे क्लास सुरू करावे.
शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद कराव लागत. सरपंच पदाची निवडणूक लढविली नाही त्याला राज्य कस चालवाव हे समजणार नाही.
समाज विघातक शक्ती मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसली आहे.पहिले त्याला अटक करा.असा टोला लगावला.
बॉक्स
* जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलूनये हा मैत्रीचा सल्ला*
माझी किंमत भाजपला माहीत आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर राजकीय बोलायचं बंद करा.हा माझा मैत्रीचा सल्ला आहे. उद्या बनसोडे साळुंखे हे कोण हे समजेल.त्यावेळी कळेल.ज्या ज्या आमदारांची घरे गाड्या फोडणारे मराठा समाजाचे नाहीत. ते ठाकरे व पवारांचे आहेत.प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याच उत्तर विनायक राऊत यांनी द्यावं.सरकार वडापावची गाडी नाही. आमचं सरकार कायम टीकणार आहे.त्यामुळे दोन्ही राऊतांना डबलबारी साठी बोलवा येवढेच काम त्यांना राहिले आहे.