*कोकण Express*
*..राऊतना त्याच्या मालकांचा मुलगा चप्पलने मारेल.;आमदार नितेश राणे*
*संजय राऊत नी समलिंगी विषयावर बोलू नये*
*वरून सरदेसाई याने पोलिसांना शिव्या दिल्या,धक्काबुक्की केली होती त्याचा सत्कार कसा केला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिवस रात्र नाईन्टी मारून झोकांडे देत असणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलूच नये.न्यालयाचा आदेश आधी अभ्यास करावा. तुम्ही कितीही आरोप केले,दबाव आणला तरी नियम तोडून विधानसभा अध्यक्ष तुझ्या बाजूने निर्णय देणार नाहीत.ते योग्यतोच निर्णय देतील.असे सांगताना आमदार नितेश राणे यांनी समलिंगी संदर्भात संजय राऊत यांनी तर बोलूच नये. तुमच्या नेत्यांचे समलिंगी चे पुरावेच माझा कडे आहेत.ते दिले तर राऊतना त्याच्या मालकांचा मुलगा चप्पले ने मारेल. आदित्य,सूरज चव्हाण आणि डीनो मोरया,म्हणजे हे तीन समलिंगी असे राऊत याना म्हणायचे आहे काय ? याचे उत्तर द्यावे. आणि मगच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचेवर टीका करावी असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला.
संजय राऊत यांनी नागपूरचा व्हिडिओ पोस्ट करून भाजप नेते पोलिसांवर हात उचलत आहेत.असा आरोप केला.त्याची चौकशी होईल मात्र हाच नियम धरला. तर केद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या घराबाहेर वरून सरदेसाई मोर्चा घेवून येतो.आणि पोलिसांना शिव्या देतो,पोलिसांच्या वर हात उगरतो. त्यानंतर उद्धव ठाकरेने दुसऱ्यादिवशी सत्कार केला.ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते म्हणजे हा सरदेसाई सरकारचा भाचा म्हणून एक न्याय का त्याचेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.त्याचे त्यावेळचे पोलिसांसोबत राडे करून शिव्या देतनाचे व्हिडिओ माझ्या कडे आहेत. मी करतो पोस्ट मग करा कारवाई अशा इशारा आमदार नितेश राणे यांना दिला आणि संजय राऊत यांनी आपल्या सरकार मध्ये वरून सरदेसाई याने पोलिसांना कशा शिव्या दिल्या होत्या याचे उदाहरण दिले. त्यामुळे तोच नियम सर्वांना लावा.असे सांगितले.
संजय राऊत रोज पत्रकार परिषद करून वातावरण घान करतो. ते राऊत ने कमी बोलावे त्यामुळे वातावरण चांगले होईल आणि त्यांना जनतेचा मिळणारा शिव्या शाप कमी होईल.
संजय राऊत हे हमास संघटनेला सहानुभूती दाखवत आहेत. देश आणि इन्सानियत च्या गद्दरणा माफी नाही.असे ही त्यांनी सांगितले.
उबाठा खासदार विनायक राऊत मंत्री गडकरी यांच्या घरासमोर का फिरत असतो. त्यांच्या गार्डनर प्रमाणे फिरत असतो. त्यांच्या घरात भांडी धुवायची बंद करायला सांगा आणि मात्र तुम्ही गडकरी यांच्यावर टीका करा. भास्कर जाधव यांची लायकी नाही.स्वतःचे अस्थित्व जाधवना दाखवायचे आहे. उदय सामंत यांना मंत्री पदे मिळाले.आणि शिनियर असून सुद्धा आपल्याला काही मिळाले नाही म्हणून भास्कर जाधव आपले महत्व वाढविण्यासाठी असे काही बोलत आणि नक्कल करत असतात.
गडकरी साहेबांनी महाडा मध्ये पुल तुटला तेव्हा चार, सहा महिन्यात नवा पुल उभा केला. तेव्हा त्यांचे अभिनंदन केले नाही. एकाद्या घटनेमुळे सर्वच चुकीचे आहे असे म्हणून आरोप करणे चुकीचे असल्याचे आमदार राणे यांनी मनसेनेला सुनावले.
उद्धव ठाकरे यांची चौकशी करावी.म्हणजे
बोरवणकर यांच्या वक्तव्याची चौकशी शनिषा होईल.आणि दंगली कुठे होणार आहेत आणि होत्या त्याची माहिती मिळेल.असे एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

