महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ असलेल्या राऊत,ठाकरे यांनी नैतिकतेचे धडे देवू नयेत

महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ असलेल्या राऊत,ठाकरे यांनी नैतिकतेचे धडे देवू नयेत

*कोकण Express*

*महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ असलेल्या राऊत,ठाकरे यांनी नैतिकतेचे धडे देवू नयेत*

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची सडकून टीका*

*विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाल लवकरच संपेल,अनिल परब स्वतःसाठी मातोश्रीवर आणतात दबाव*

*इंडिया आघाडीची बिकट झालेली अवस्था संजय राऊत यांनी आधी जाहीर करावी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नैतिकता,शपथ,असे शब्द राऊत,ठाकरे यांच्या सारख्या बरबटलेल्या लोकांच्या तोंडात शोभत नाहीत.घटनेचा खून कोणी केला ? उद्धव ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार होते तो अद्याप दिला नाही.शिवसैनिक म्हणून कोणती नैतिकता पळाली ? नीतिमत्तेचे धडे आम्हाला देऊ नका.ती नीतिमत्ता तुमच्यात असेल तर तुम्ही घरात नवरा म्हणून सुद्धा राहण्याच्या लायकीचे नाहीत.तुमच्या नैतिकता म्हणजे दाऊद इब्राहिम ने मुंबईत येऊन आम्हाला धडे देण्यासारखे आहे.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
माझ्या पत्र नंतर संजय राऊत ची अध्यक्ष श्री. नार्वेकर यांच्यावरील टीका थोडे कमी झाली आहे. मात्र त्यांची खासदारकी या पुढे राहणार नाही. लोकशाहीचा खून आणि मोठे मोठे शब्द बोलून संजय राऊत न्यायाधीश असलेल्या विधानसभा अध्यक्ष आणि प्रक्रियेवर दबाव आणत आहे. म्हणून अध्यक्ष न्यायधिषाच्या भूमिकेत आहेत.त्यांच्यावर टीका करणे हा हककभंग आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नी नागपूर पाहून यावे आणि मातोश्रीवर आपल्या मालकाला भेटून नागपूर मध्ये केलेला विकास मुंबईत का नाही केला याचा जाब विचारावा.
दानवे हे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता राहणार नाही.अनिल परब मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर जावून रडत आहेत. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हवे आहे आणि त्यामुळे ते मातोश्रीवर दबाव आणत आहेत. दानवे यांचा कार्यकाल लवकरच संपेल असे भाकीत आमदार नितेश राणे यांनी केले. त्यामुळे दानवेंना कार्टून पाहायचे आलेत तर मालकाच्या मुलाकडे पहावे असा सल्ला दिला.
एनडीए मध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब ची शिवसेना आहे.तुम्ही इंडिया अलायन्सचे काय झाले ते सांगा. साधे चिन्ह तरी ठरवू शकले काय ? हरियाणाच्या इंडिया आघाडीतीचा कार्यक्रम सोडून नितीश कुमार पंडित दीन दयाळ उपाध्याय यांच्या अभिवादन कार्यक्रमाला गेले होते. यातून इंडिया आघाडीची काय अवस्था झाली आहे हे कळते.
त्यामुळे आमच्या कडे पाहण्यापेक्षा स्वतःचे घर सांभाळ.असा सल्ला आमदार राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!