*कोकण Express*
*गणेशोत्सवाच्या सणाला कणकवली मध्ये येणाऱ्या भक्तांना हायवे लगत एकही सुलभ शौचालय नाही*
*सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र पेडणेकर*
आज कणकवली शहर झपाट्याने वाढत असताना, मुंबई गोवा हायवे लगत एक सुध्दा सुलभ शौचालय नसावे या सारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. अप्पासाहेब पटवर्धन चौकात जुना भाजी मार्केट ( नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ)जे सुलभ शौचालय होते ते नविन बांधकामा करिता ते एप्रिल -मे महिन्यात तोडल्यामुळे, आज अशी परिस्थिती आली आहे की येथील व्यापारी बांधवांना दुर्गंधी मुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे*
कणकवली येथे काहीच सोय नसल्याने मुंबई येथून येणारे, तसेच खरेदी साठी येणाऱ्या नी मार्केट मधील संपूर्ण जागेचा सुलभ शौचालया सारखा वापर केला, आणि याच कारणामुळे संपूर्ण मार्केट मध्ये दुर्गंधी पसरली आहे,
यापेक्षा दुर्दैव म्हणजे ज्याने सुलभ शौचालया चे काम घेतले, तो सुध्दा हैराण झालेला आहे, कारण बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी आत मध्ये जाऊन त्याचा हि सुलभ शौचालया सारखा वापर केला आहे, रोज सकाळी काम सुरू करताना त्याचे कामगार सर्व घाण काढत आहेत,
*तसेच पाहिले तर चुकी
सामान्य जनतेची नाहीये, चुक असेल तर ती, कणकवली शहरातील प्रशासनाची आहे, असे म्हणावे लागेल,कारण झपाट्याने वाढत चाललेल्या कणकवली शहरात आणि ते सुद्धा मुंबई गोवा हायवे वर संपूर्ण बाजार पेठे ची उलाढाल असताना, कायमचीच वर्दळ असलेल्या मुख्य चौकात आणि संपूर्ण हायवे ला सुलभ शौचालय नसावे, ( *बस स्थानक वगळून*) हे दुर्दैवी आहे, सर्वात अडचणी चे ठरते ते आमच्या माता भगिनींना,
*या सर्व परिस्थिती चा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे*
*श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर
सामाजिक कार्यकर्ता, कणकवली
९५०३००५१६३*