*कोकण Express*
*शेतकऱ्यांचे तारणहार – मोदी सरकार* — भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष, गणेश तात्या भेगडे*
*नवनिर्वाचित भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किसान मोर्चा पदाधिकारयांशी चर्चा*
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत व भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी त्यांचे स्वागत केले . यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सचिव रंगनाथ सोळंकी उपस्थित होते .
यावेळी जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किसान मोर्चा चा कामाचा अहवाल सादर केला . तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मंत्रालय स्तरावर सोडविण्यासाठी मदत करावी , अशी मागणी केली .
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष भेगडे म्हणाले की , मोदीजींच्या नेत्रुत्वात देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्त्वाचे स्थान दिले आहे . त्यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य राहीले आहे . त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गेल्या नऊ वर्षांत केलेले काम ऐतिहासिक आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठीची युरीयाची टंचाई संपुष्टात आणली. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी मोदी सरकारने जमीनीचा पोत सांगणारी *साॅईल हेल्थ कार्ड योजना* राबविली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार निर्णय घेतले . मोदीजींनी शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ केली . पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना सहजपणे विम्याचे कवच मिळाले . राज्यातील भाजपा महायुती सरकार तर्फे शेतकऱ्यांना *एक रुपयात पिक विमा योजना* सुरू करण्यात आली असून याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली . त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट मदत देण्याची *प्रधानमंत्री किसान सन्मान योजना* मोदी सरकारने आणली . त्याला जोड म्हणून आता राज्यातील सरकारनेही तीतकीच रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी *नमो शेतकरी महासन्मान* योजना लागू केली आहे . मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप मोठे विकासकार्य केल्यानंतर आता नुकतीच *पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र* ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच ठिकाणी पुरवण्यासाठीची ही योजना आहे . ” *जय किसान* ” ही घोषणा मोदी सरकारने खरया अर्थाने अंमलात आणली आहे . भाजपा चा किसान मोर्चा मोदी सरकारची कामे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो . मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची जनतेला माहिती द्यावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा असे आवाहन गणेश तात्या भेगडे यांनी केले .
यावेळी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील व बाळु प्रभु , उपाध्यक्ष किशोर नये , चिटणीस अजय सावंत , मालवण मंडल अध्यक्ष महेश सारंग , ओरस मंडल अध्यक्ष श्री.सूर्यकांत नाईक , कणकवली मंडल अध्यक्ष श्री.दामोदर नारकर , वेंगुर्ले मंडल अध्यक्ष श्री.यशवंत पंडित , सौ.दिपा काळे – जिल्हा महिला समन्वयक , श्री.प्रसाद भोजने , श्री.दिनेश राऊळ , श्री.सुशील तांबे , श्री.प्रकाश झेंडे , श्री.रामचंद्र पाटकर , श्री.सॅम्युअल काळे ,
श्री.प्रकाश राणे , श्री.ज्ञानदेव परब ,
श्री.जयवंत परब , श्री.मिलिंद लोहार , श्री.वैभव शेणई , श्री.महादेव सावंत , श्री.दिवाकर ठाकूर इत्यादी किसान मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .