*कोकण Express*
*केसरकरांना जमलं नाही पण रवींद्र चव्हाणांनी करून दाखवले…..*
*एकनाथ नाडकर्णी, हत्ती प्रश्न राजन तेलींच्या पुढाकारातून मार्गी लागल्याचा दावा…*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांना जमले नाही परंतु रवींद्र चव्हाण यांनी करून दाखवले त्यामुळे आता हत्ती प्रश्न नक्कीच सुटणार आहे, असा विश्वास भाजपचे नेते त्याचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी व्यक्त केला आहे… दरम्यान केवळ माजी आमदार राजन तेली यानी पुढाकार घेतल्यामुळे आता हत्तींचा प्रश्न सुटणार आहे. नुकसान भरपाई ४ पट वाढ मिळणार आहेत तसेच हत्तींना राखीव वन क्षेत्रामध्ये पाठविण्यात येणार आहे, तशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या आहेत, त्यामुळे आम्ही A आभारी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.