*कोकण Express “
*रावराणे यांच्या घराच्या अतिक्रमणासंदर्भात आवाज उठवल्यामुळे राग धरुन आमच्यावर गुन्हे दाखल*
*बंद असलेली मायनिंग चालू करण्यासंदर्भात रावराणे यांनी घातला घाट*
*गुन्हाच केला नसल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गेलोच नाही ; लोरे न. १ येथील चंद्रशेखर रावराणे यांनी केला आरोप..
*कणकवली ः प्रतिनिधी*
लोरे नंबर १ चे सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांच्या घराच्या अतिक्रमणासंदर्भात आवाज उठवल्यामुळे तो राग मनात ठेवून ग्रामसेवकाची डाल बनवत आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कालच्या ग्रामसभेमध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार करत असता सरपंच व त्याचे वडील त्यांचे बंधू अशा तिघांनाही ग्रामस्थाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्नाचा भडीमार केल्याने सरपंच यांना गावातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या कामासंदर्भात विचारणा केली? त्यावर चर्चा न करता स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामसभेमध्ये बंद असलेली मायनिंग चालू करण्यासंदर्भात ठराव मंजूर या रावराणे कंपनीने केला असल्याचा आरोप चंद्रशेखर रावराणे यांनी केला आहे.
त्यासाठी ग्रामसभेला सरपंच गटाने नवीन कुर्ली पुनर्वसन गावातील काही गावातील लोक जमवून ग्रामसमेत हेतू पुरस्कार आणत गोधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसतानाही सत्ताधान्याने सत्तेचा माज दाखवत आमच्यावर ग्रामसेवकाला हाताशी धरून कारवाई करण्याचा खोटारडा आणि केविलवाना प्रयत्न विरोधकांनी केला आहे. तसेच आम्ही गुन्हाच केला नसल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गेलोच नाही, दोन्ही गट पोलीस ठाण्यात नव्हते तर सत्ताधारी रावराणे गट होता असे चंद्रशेखर रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
विरोधकांच्या प्रश्नाची उत्तरे न देता गोंधळून गेलेले सरपंच व त्यांचे बंधू व वडील तुळशीदास रावराणे यांनी प्रश्नाची उलट सुलट उत्तर देव ग्रामस्थांना
१९५८ च्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करु अशी थेट धमकीच दिली. ग्रामसभेत गोंधळ सत्ताधाऱ्यांनी घालण्याचा प्रयत्न केला. असे असूनही ठरवून
सरपंच यांच्या घराची तक्रार केली म्हणूनच मनात राग ठेवून ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम यांना हाताशी धरून जबरदस्ती पोलीस स्टेशनला नेऊन,
जामच्यावर गुन्हे दाखल करण्याचा केविलवाणा प्रयत्न या सरपंच बाप लेकाने केलेला आहे.
आम्ही गावाच्या हितासाठी कायमच काम करत असून सत्ताधारी बाप लेकांना अशी तालुक्यामध्ये बोंब केली की आम्हाला आमच्या गावात विरोधक शिल्लक नाही. परंतु गावातील परिस्थिती फारच वेगळी आहे. या बाप, लेख यांच्या कारभाराला लोरे नंबर १ मधील ग्रामस्थ कंटाळलेले आहे. आम्ही विरोध केला म्हणून त्यांनी आपल्या नेत्यांच्यामार्फत जबरदस्ती आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावले. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. पण लोरे गावातील ग्रामपंचायतीमधला भ्रष्टाचार व लोरे गावातील सरपंचांनी केलेले स्वतःच्या घराचे अतिक्रमण यांच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ पातळीवर आवाज उठवणार आहोत. लोरे गाव सरपंचावर कारवाई होणे गरजेचे आहे. ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही तसा निर्धार केलेला आहे. जे गुन्हे दाखल केले त्याचे आम्ही कायद्यानेच उत्तर देऊ ग्रामसेवक हे कोणा एका व्यक्तीचे नसून ते संपूर्ण गावाचे असतात, परंतु लोरे ग्रामपंचायत ग्रामसेवक हे सरपंच व त्यांच्या घरातील मंडळी यांचे ऐकून संपूर्ण गावावर अन्याय करत आहेत. याची दाद आम्ही वरिष्ठ पातळीवर मागणार आहोत. ग्रामसेवक यानी या लोरे नंबर एक गावामध्ये जी गोष्ट लोरे गावाच्या आज पर्यंतच्या ग्रामपंचायत काळामध्ये काळा दिवस आणण्याचं काम या ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम यांनी केली असल्याचा आरोप चंद्रशेखर रावराणे यांनी केला आहे..