धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूची कथा लिहिली जाईल तेव्हा उद्धव ठाकरे त्यात व्हिलन असतील

धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूची कथा लिहिली जाईल तेव्हा उद्धव ठाकरे त्यात व्हिलन असतील

*कोकण Express*

*धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूची कथा लिहिली जाईल तेव्हा उद्धव ठाकरे त्यात व्हिलन असतील*

*राष्ट्र संघ,आरएसएस,पू. हेगडेवार नसते तर देश इस्लाम राष्ट्र झाले असते*

*२०२४ च्या निवडणुकीत भिडे गुरुजींची मदत घेणार नाही हे काँग्रेस नेत्यांनी जाहीर करावे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ठाण्यात जावून धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल संजय राऊत आणि त्याचे मालक उद्धव ठाकरे मोठ मोठे बोल बोलले.मात्र धर्मवीर आनंद दिघे यांना मानसिक त्रास उद्धव ठाकरे दिला होता.बाळा साहेब आणि आनंद दिघे यांच्यात काड्या लावण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले होते.आनंद दिघेंचा द्वेष उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय करायचे हे सर्व शिवसैनिकांना माहित आहे.दिघे साहेबांच्या मुत्यूची कथा जेव्हा लिहिली जाईल तेव्हा त्यात उद्धव ठाकरे यांचा रोल व्हीलनचा असेल. समझनेवाले को इशारा काफी है..!अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.तर हिंदुत्व च्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
सुंता झालेल्या मौला उद्धव ठाकरे यांच्याकडून हुदुत्वाची सर्टिफिकेट नको. तुमचे किती हिंदू राहिला आहे ? तुम्ही हिंदुत्व शब्द उच्चरण्या इतके हिदू राहिलेला नाही. त्यामुळे आम्हला हिंदुत्व शिकवू नका. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
धर्मवीर चित्रपटात जो पत्रकार बाळासाहेब, आनंद दिघे, शिवसेना यांच्या बद्दल नकारात्मक प्रश्न विचारतो तो संजय राऊत आहे.हा राऊत अगोदर सेना, आनंद दिघे, बाळासाहेब यांच्या विरोधात होता.त्यामुळे धर्माविरणची दिघे साहेब मर्द होतेच. तुमच्या सारखे नामर्द नव्हते.
स्वतंत्र काळात आणि नंतर राष्ट्र संघ नसता,आरएसएस नसता आणि हेगडेवार साहेब व त्यांचे कार्यकर्ते नसते तर आज देशात हिंदू,राहिला नसता.इस्लाम राष्ट्र झाले असते.अग्रलेख लिहिण्याऱ्याने ज्ञान घ्यावे. आज त्यांच्यामुळेच आम्हीं सर्व आहेत.
आणीबाणी वेळी तुमची भूमिका काय होती हे देशाला कळुदे ते आदी सांगा.
अजित दादा ना भेटायला गेला तेव्हा ७० हजार कोटी दिसले नाहीत. सरड्याला पण लाज वाटेल येवढे जलद उद्धव ठाकरे रंग बदलतात.भाजप च्या गाडी खूप जागा आहे. आमची गाडी स्पोर्ट व्हॅन आहे. तुमची तर खटारा गाडी आहे. आम्हीं किती खरे आहोत असे प्रत्येक चायनीज कंपन्या सांगत असतात. तसेच संजय राऊत आणि त्यांचा मालक ओरडुन सांगत आहेत.
२०१९ पर्यंत आमदारकी साठी मेहुण्याला वाचवावे म्हणून भेटला तेव्हा मोदी साहेब हुकूमशाह वाटले नाहीत काय ? असा सवाल करत.कोण नालायक आणि कोण लायक आहेत ते सर्वांना माहीत आहे.हो मी बाळासाहेबांना मुलगा आहे असे सांगावे लागते. यातच सर्व आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!