*कोकण Express*
*वेंगुर्ले खरेदी विक्री संघांत ” पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्रांचा ” शुभारंभ कार्यक्रमाचे प्रसारण*
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राजस्थान मधुन ” पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा ” शुभारंभ केला . हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पहाण्यात आला .पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमात किसान समृद्धी सुवीधा केंद्र देशभरात २ लाख ८ हजार ठिकाणी सुरु केली . त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे , औषधे , खते , कीटकनाशके व अन्य अवजारे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत .
वेंगुर्ले तालुक्यात शहरामध्ये ५ केंद्र व ग्रामीण भागात १६ केंद्र आहेत . त्याठीकाणी भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांना एकत्रित करुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे उद्घाटनपर संभाषण प्रसारित केले होते . या कार्यक्रमाला ठिक ठिकाणी शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला .
शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते.पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे.एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे.सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे.
वेंगुर्ले खरेदी विक्री संघांत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँकचे चेअरमन मनिष दळवी , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , विजय महादेव रेडकर, एम.जी.मातोंडकर, सोमा दत्तारम मेस्त्री, बाबाजी लवू सावंत, नंदकिशोर घाडी, मोहन जयराम सावळ, ज्ञांनेश्वर राजाराम वैद्य, रामकृष्ण अर्जुन सावंत, निलेश प्रेमानंद पाटील, प्रशांत महादेव पांढरे, संतोष शांताराम केणी, सूर्यकांत पांडुरंग गावडे, नारायण वैद्य, कांचन नाईक, प्रदीप प्रभाकर जबडे, श्रीकृष्ण अविनाश परब , हर्षल भालचंद्र परब, मकरंद विजय प्रभू , वसंत सहदेव खाजणेकर, गणेश सोमा मेस्त्री, संजय रामचंद्र केणी, विजय शांताराम केळजी, वृंदा गवंडलकर, श्रीकांत परब, दशरथ जयराम सावंत, नारायण परब,किसान मोर्चाचे यशवंत पंडित , किशोर परब, कमलेश गावडे , सीताराम परशुराम तुळसकर, संतोष सीताराम परब, रामदास वामन रेडकर, सत्यवान शिवराम पालव, प्रसाद कोनकर,ता.चिटणीस समीर कुडाळकर इत्यादी शेतकरी व भाजपा कार्यकर्त्ये उपस्थित होते .