*कोकण Express*
*पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अवचित साधून ज्येष्ठ शिवसैनिकांना नारळ रोपाचे केले वाटप*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला साजेशे नेतृत्व आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेले कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्यांचे राज्यात व देशात वाढत असलेले महत्त्व यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहीजे. असे प्रतिपादन जिल्हा बॕंक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आयोजित कार्यक्रमात सावंत यांच्यावतीने तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिकांना नारळ रोपांचे वाटप करण्यात आले.यावेळी सावंत बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, माजी बॕंक संचालक दिगंबर पाटील, शहरप्रमुख शिवाजी राणे, सुनिल रावराणे, माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकुडे, नगरसेविक मनोज सावंत, सौ. रावराणे, सुनिल रावराणे, श्रीराम शिंगरे, बाबा मारे, विलास पावसकर, निवृत्त पोलिस अधिकारी संदीप सरवणकर, हेमंत बावधणकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत पुढे म्हणाले, शिवसेनाही सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी संघटना आहे. शिवसेनेमुळे अनेक शेतकरी व सर्वसामान्यांची मुले नगरसेवक, आमदार, मंञी झाले आहेत. त्यामुळे कोणी कितीही टिका केली तरी फरक पडत नाहीत. कारण आंबे असणाऱ्या झाडावरच दगड मारतात. असे सांगत पुढे म्हणाले या मतदार संघाचे आमदार उठबस उध्दव ठाकरेवर टीका करतात. त्यांना आपण महाराष्ट्राचे नेता झाल्यासारखे वाटते त्यांच्यावर आज आपण काही बोलणार नाही.आपण सर्वांनी निष्ठेने काम करा हा कठीण काळ काही दिवसात संपेल असे सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना नंदु शिंदे यांनी केली. यावेळी दिव्या पाचकुडे, संदीप सरवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सूञसंचलन युवासेना जिल्हाचिटणिस स्वप्निल धुरी यांनी केले.