*कोकण Express*
*इतिहासातील सूर्याजी पिसाळ संजय राऊत च्या रूपाने जन्माला आला*
*आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत घणाघाती टीका
* मालकाचा मुलगा,आणि त्यांच्या नातेवाईकांचा कलंक कसा पुसणार केला सवाल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे.
राऊत याने शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळ ने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती. अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे संजय राऊत यांच्यावर केली.राऊत च्या मालकाचे दोन्ही मुलगे वाया गेलेले आहेत. एक दारू पिताना दिसला तर दुसऱ्यावर खुनाचे आरोप आहेत म्हणून उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत.अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत घेवून जोरदार टीका केली ते म्हणाले,कलंकित राजकारणावर बोलताना तुमच्या फॅक्टरीत शेणाची खान आहे. त्याची माहिती पण द्या.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणले कलंकित असलेला तुझ्या मालकाचा मुलगा तुला कलंकित वाटत नाही का ? त्या मालकाच्या मुलावर भ्रष्टाचाराचे महिलेच्या खुनाचे, छळाचे गुन्हे दाखल आहेत याचा कलंक तू कसा पुसणार ? असाच सवालही केला
उद्धव कलंकीत ठाकरे हे नाव आता तयार झाले आहे.याची लाज वाटली पाहिजे.झाकीर चे नाव घेताना तुला लाज वाटली पाहिजे.कलंकित लोकांच्या आणि नातेवाईक यांच्या सोबत तुझा मालक वाढदिवस साजरे करतो.अशा पाटणकर,सरदेसाई, यांचा कलंक पुसण्याची हिम्मत तुझ्यात आहे काय ? नवाब मलिक बाबत तुझं थोबाड उघडलं नाही.
दाऊद सोबत नवाब ने व्यवहार करून पडमविभूषण पुरस्कार मिळवला आहे का ? देशाच्या विरुद्ध गद्दारी करणारा, नवाब मलिक चा राजीनामा सुद्धा घेतला नाही. त्यांच्या नातेवाईकां सोबत बिर्याणी खाल्ली .सत्तेसाठी तुझा मालक आणि कुटुंब किती कलंकित झाले आहेत हे यावरून दिसते.