स्व.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती ; भाजपा नेते, आम. नितेश राणे

स्व.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती ; भाजपा नेते, आम. नितेश राणे

*कोकण Express*

*स्व.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती ; भाजपा नेते, आम. नितेश राणे*

*शरद पवार यांच्या गुगली मुळेच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसले*

*उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राऊत नावाचा शकुनी मामा आहे तसाच आदित्य ठाकरे यांच्याकडे वरून सरदेसाई हा शकुनी मामा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

स्व.बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी विकून उद्धव ठाकरे यांनी जी बेइमानी केली. त्याला बाजूला करून ५० योध्ये सोबत घेवून.शिंदे – फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली. हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे यांना कायम स्वरुपी घरी बसविले.आज त्या स्वाभिमानाची वर्ष पूर्ती आहे.स्व.बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्व आणि सरकारची वर्ष पूर्ती आहे.असे प्रतिपादन भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केले.ते ओम गणेश निवासस्थाने पत्रकारांशी बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,आदित्य ठाकरे यांचे जवळचे आणि त्यांचे कट्टर असलेला राहुल कणाल हा उद्या सेनेत प्रवेश करणार.हा आदित्य ला फारमोठा राजकीय धका आहे. शकुनी मामा संजय राऊत उद्धव ठाकरे यांचे कडे आहे तसा वरून सरदेसाई हा आदित्य कडे शकुनी मामा आहे.वरून सरदेसाई मुळे आदित्य ठाकरेंच्या आजू बाजूला फक्त नातेवाईक राहिले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी सोडून चालले आहेत.अशी टीका भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केली.
कोव्होड सेंटर भ्रष्ट करभरात वरून सरदेसाई यांचा मोठा वाटा.सूरज चव्हाण यांच्या जबाबात सरदेसाई यांचा सर्वत्र उल्लेख आला आहे. आता सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इच्छुक आहे.ते कुठे कुठे भेटून पक्षात घेण्याची विनंती करत असतात हे लवकरच संगु.शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाकरेंना कायमचे निवृत्त करण्याचे काम राऊत,सरदेसाई करत आहेत.असेही आमदार राणे म्हणाले.
यातूनच शरद पवार समजायला आम्हाला शंभर जन्म द्यावे लागणार असतील तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील.असा टोला लगावला. शदर पवार यांच्या गुगली मुळे पहाटेच्या शपथविधीत व्हीकेट जशी अजित दादांची पाडली तशी ठाकरेंना कायमचे घरी बसवून त्यांचीही व्हीकेट पाडली आहे.
खा.संजय राऊत हे दिल्लीत हाऊस किपिंग चे करत आहेत काय ? त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबध्दल काय माहित आहे. त्यांनी पत्रकारिता करावी.जिहादी विचारांचे लोक फारच वळवळ करू लागले आहेत. जास्त फुगे उडवत असती तर जिहादी लोकांना एकदाच टाचणी लावावी लागेल.आणि ती कशी लावायची हे आम्हाला माहीत आहे असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!