*कोकण Express*
*सर्व प्रकारची सेवा एकाच ठिकाणी पुरवल्यास विकास संस्था त्या त्या गावच्या विकासाच्या केंद्रबिंदू बनतील:मनिष दळवी*
*शासनाची प्रोत्साहनपर अनुदानची योजना कर्जमाफीसाठी चांगला पर्याय*
*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)*
आपल्या गावातील परिसरात अनेक शेतकरी,विद्यार्थी आहेत.हे सगळे लोक आपल्या विकास संस्थेबरोबर आल्यास विकास संस्थेचे अन्य व्यवहार वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक संधी प्राप्त होईल.आपल्याला सगळ्या प्रकारची सेवा जर आपण आपल्या विकास संस्थेच्या कार्यालयांमध्ये दिली तर त्या गावचं एक विकासाचं केंद्रबिंदू म्हणून आपण त्या विकास संस्थां पुढे आणू शकतो. शासनाने कर्जमाफीवर चांगला पर्याय काढला असून प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली आहे. सदर योजना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे विकास संस्थाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.विकास संस्थाच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी जिल्हा बँकेची यंत्रणा कायम आपल्या सोबत आहे. अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओरोस येथील पतपेढी हॉलमधील संस्था चेअरमन,सचिव यांच्या साठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यातील विकास संस्थाचे चेअरमन व सचिव यांच्यासाठी प्राथमिक शेती सहकारी संस्थांसाठी कॉमन सर्विस सेंटर बाबत प्रशिक्षण कार्यक्रम ओरोस येथील शिक्षक पतपेढी मधील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा नाबार्ड प्रबंधक अजय थुटे,सुयोग दीक्षित हर्षद ढेकणे-कॉमन सर्विस सेंटर अधिकारी, जिल्हा उपनिबंधक प्रतिनिधी श्री.खंडागळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षकउर्मिला यादव, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक देवेंद्र लोकेगांवकर,संदेश हडकर तसेच जिल्ह्यातील विकास संस्थांचे चेअरमन,सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मनिष दळवी म्हणाले.आता शासनाच्या माध्यमातून कॉमन अकाउंटिंग सिस्टमच्या द्वारे तुम्हाला आजची एन्ट्री आजच करावी लागेल म्हणजे तुम्ही आजच्या तारीख ने कालची एन्ट्री आज करायला गेला तर तुम्हाला त्या सिस्टम वर या पुढच्या काळामध्ये काही ओपन होणार नाही. यापुढे पोर्टलवर आपल्याला सर्व माहिती अपलोड करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपला जिल्हा असल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये ही सगळी प्रक्रिया पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या दिवसाचं काम हे त्याच दिवशी संपवलं पाहिजे. गावातल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देत असताना संस्थेचा नफा कशा पद्धतीने वाढेल याची अधिक काळजी आपण घेतली पाहिजे. हे करत असताना आपली संस्थेचा कर्ज व्यवहार एनपीए मध्ये येता नये यासाठी कडक भूमीका घेण्याची तयारी संस्था पदाधिकारी म्हणून आपण घेतली पाहिजे.असे शेवटी मनिष दळवी म्हणाले.