नीट चे ध्येय साध्य करण्यासाठी इतर गोष्टी दुय्यम मानाव्यात: आदित्य नाईक

नीट चे ध्येय साध्य करण्यासाठी इतर गोष्टी दुय्यम मानाव्यात: आदित्य नाईक

*कोकण Express*

*नीट चे ध्येय साध्य करण्यासाठी इतर गोष्टी दुय्यम मानाव्यात: आदित्य नाईक*

नीट सारखी कोणती परीक्षा पास व्हायची असेल तर इतर कमी महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित केल्या पाहिजेत .स्वप्न पूर्तीसाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. अभ्यास किती करावा , कसा करावा हे फक्त शिक्षकच सांगू शकतात. असे मत स्वतः नीट परीक्षा उत्तमरीत्या पास करून गव्हर्मेंट कॉलेजला एमबीबीएस साठी प्रवेश घेतलेल्या कु. आदित्य नाईक यांनी “नीट परीक्षेच्या यशाचे गुपित” या विषयावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त केले.
कुडाळ येथील बॅ. नाथ पै शैक्षणिक भवनात बॅ. नाथ पै करिअर अकॅडमी मार्फत नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षेत यश कसे मिळवावे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्या परिसंवादात आदित्य नाईक म्हणाले की, “मी हायस्कूल मध्ये असतानाच ठरवले की ,मला डॉक्टर बनायचे आहे. आणि परमेश्वराने बनवलेल्या नितांत सुंदर मनुष्य देहाचा अभ्यास करण्याची सुसंधी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने डॉक्टर पेशातच मिळू शकते. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करण्याची तयारीही होती. नीट परीक्षेची तयारी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचा सखोल अभ्यास, विषयांची संकल्पना समजून घेण्यावर क्रमिक पुस्तकांवर जास्त भर, नियोजनबद्ध सराव, आपल्यातील उणीवांचा शोध, कठीणांवर फोकस हे आपल्या यशाचं गमक आहे”.असं आदित्य नाईक म्हणाले. सातत्यपूर्ण अभ्यास -प्रयत्न आणि ध्येयाचा ध्यास धरून हे दोन वर्षांच व्रत आपण पूर्णत्वास नेलं.हे सांगताना,आत्या,आई-वडिलांची साथ,त्यांचा विश्वास या प्रवासात खूप मोलाची होता. कारण आई-वडिलां एवढे आपले हितचिंतक कोणीच नसतात.असंही ते म्हणाले. नीट परीक्षेच्या यशासाठी अन्य टिप्स देताना- निराशा टाळायची, आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही, याचबरोबरीने सोशल मीडिया पासून दूर, अनावश्यक लोकसंग्रह टाळणे याशिवाय अभ्यासाकडे तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही .याचा आवर्जून उल्लेख करत विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला.
विविध उत्तम प्रश्नांच्या माध्यमातून विभा वझे यांनी या परिसंवादामध्ये आदित्यकडून विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य अशी माहिती, मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे नीट व जेई परीक्षा संदर्भात बॅरिष्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ‘समर व्हेकेशन कॅम्प’ चे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तीकडून दिले जाते व ज्ञानाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
एकूण उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच आदित्य नाईक यांचे वडील दीपक नाईक व आई स्मिता नाईक उपस्थित होत्या.
कार्यक्रमास संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, CBSE शाळेच्या उपप्राचार्या विभा वझे, अकॅडमी समन्वयक अर्जुन सातोस्कर, कला वाणिज्य आणि विज्ञान महिला व रात्र महाविद्यालयाचे प्रा. अरुण मर्गज नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!