तेलींच्या तिकीटाचा निर्णय पक्ष घेईल, तुमची वायफळ बडबड नको

तेलींच्या तिकीटाचा निर्णय पक्ष घेईल, तुमची वायफळ बडबड नको

*कोकण Express*

*तेलींच्या तिकीटाचा निर्णय पक्ष घेईल, तुमची वायफळ बडबड नको*

*संजू परबांचा पलटवार भविष्यात केसरकर एकनाथ शिंदेनाही फसवतील….*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय भाजपाचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे राजन तेली हे बाहेरचे आहे, असे सांगून राजन पोकळे व अशोक दळवी यांनी फुकटची बडबड करू नये, असा टोला माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी लगावला. दरम्यान फसवणुकीची संस्कृती ही दीपक केसरकर याचीच आहे. त्यांनी आजपर्यंत दिलीप नार्वेकर, प्रवीण भोसले, शरद पवार, नारायण राणे आदींना फसवून आपले स्वार्थी राजकारण साचले आहे. भविष्यात ते एकनाथ शिंदेंनाही फसवतील. त्यामुळे अशा फसवून करणाऱ्या व्यक्ती सोबत राहणा-यांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगू नये, असेही श्री. परब म्हणाले.

दोन दिवसापूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अशोक दळवी व राजन पोकळे यांनी श्री. राजन तेली यांनी सावंतवाडीत घर बांधले, तरी ते निवडून येणार नाहीत, ते स्थानिक नाहीत, अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आज श्री परब यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी नगरसेवक नासिर शेख, जानंद नेवगी, दिलीप भालेकर बटी पुरोहित आदी उपस्थित होते.

श्री. परब पुढे म्हणाले, दळवी आणि पोकळे यांनी कोणी बाहेरून येऊन इथे घर बांधले, म्हणून ते इथले रहिवासी होऊ शकत नाहीत, ते निवडून सुद्धा येवू शकत नाहीत, अशी टीका जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर केली होती. मात्र त्यांनी बाहेरचा बाहेरचा ही बडबड थांबवावी. येत्या काळात कोणाला उमेदवारी द्यावी हा निर्णय पक्ष घेईल. ती पक्षातर्गतची गोष्ट आहे. असे ते म्हणाले. तर केसरकरांनी आतापर्यंत माजी हा नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची फसवणूक केली आहे. ते एक नंबरचे फसवे मंत्री आहेत. विविध विकासकामांच्या घोषणा करून जनतेची सुद्धा त्यांनी आतापर्यंत फसवणूक केली आहे. मल्टी स्पेशालिटीचा प्रश्न सुद्धा ताटकळत ठेवण्यास तेच जबाबदार आहेत. निवडणूक तोडावर आली तशी आता या प्रकल्पांना सुरुवात करण्याची घाई त्यांच्याकडून होत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या हातून काहीच होणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला….

ते पुढे म्हणाले, केसरकरांपेक्षा दुप्पट निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या काळात आला आहे. त्यामुळे त्यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!