सदोष मनुष्यवधाच्या गुन्हासंदर्भात योग्य ती कारवाई करा म्हणून दिले निवेदन

सदोष मनुष्यवधाच्या गुन्हासंदर्भात योग्य ती कारवाई करा म्हणून दिले निवेदन

*कोकण Express*

*सदोष मनुष्यवधाच्या गुन्हासंदर्भात योग्य ती कारवाई करा म्हणून दिले निवेदन…*

कृष्णा तुकाराम चव्हाण.नेरुळ.कुडाळ या आपल्या समाज बांधवाचा पादवा उत्सवाला म्हापण येथे जात असताना अंदुर्ले टीटा येथे एका फॉरविलर गाडीने मागून ठोकले व कृष्णा चव्हाण याला गांभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,ही घटना घडल्या नंतर *संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र* या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे राज्याध्यक्ष श्री.संजय (छोट्या) कदम यांच्या उपशस्थित पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दिनांक.२५/०३/२०२३ रोजी निवेदन देऊन याचा योग्यरीतीने तपास करून आरोपीला ३०४ अन्वये मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले,
व लगेच तिसऱ्या दिवशी दिना.२७/०३/२०२३ रोजी निवती पोलीस स्टेशनचे हवालदार श्री.भांगरे साहेब यांना भेटून त्यांनाही या घटनेबाबत माहिती देऊन निवेदन देण्यात आले होते,
परंतु या घटनेला आज ९/१० दिवस उलटून गेले तरी अजूनही पोलिसांना आरोपीचा तपास लागत नाही,निवती पोलीस स्टेशनला आमचे समाज बांधव श्री.अजित नेरकर (चव्हाण) हे वारंवार फोन करून चौकशी करत असून पोलीस फक्त तपास करत आहेत असच सांगत असल्याचे श्री.अजित नेरकर यांनी आम्हांला आज कळवले,हे आम्हाला कळताच आज पुन्हा आम्ही मी स्वतः संस्थेचे राज्य खजिनदार श्री.रवींद्र पावसकर साहेब राज्य संचालक श्री.देवेंद्र कसालकर साहेब तसेच अजित नेरकर आम्ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना भेटून या घटनेचा तपास क्राईम ब्रॅंच किव्हा डी वाय अस पी.दर्जा असलेल्या अधिकाऱ्याकडे सुपूर्त करावा अशी विनंती केली,
*सन्मा.अधीक्षक साहेबानी लगेचच निवती पोलीस स्टेशन व या घटनेचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन कृष्णा तुकाराम चव्हाण यांच्या घटनेचा तपास लवकरात लवकर सादर करून आरोपीना अटक करावी असे आदेश देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!