*कोकण Express*
*अपप्रवृत्तीच्या विरोधात जे जे लढले त्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली;संदेश पारकर*
गेले दोन दिवसापासून सिंधुदुर्गात शिवसेनेचा एक वातावरण निर्माण झाले . सुभाष देसाई यांनी शिवगर्जना यात्रेची घोषणा केली. आणि जो प्रतिसाद आपणास वृत्तपत्रांमध्ये पाहिलं सोशल मीडियामध्ये पाहिजे की मोठ्या संख्येने प्रत्येक तालुक्यातील निष्ठावंत शिवसेने उपस्थिती दाखवतो.सुभाष देसाई यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी लोक पोहोचतात. गेले आठ महिने या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जे अनेक संकटात शिवसेनेवर अनेक आघात झाले त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज उद्धवजींनी मोठ्या मनाने शिवसैनिकाला सांगितलं की तुम्ही स्वतःला खचू देऊ नका तुम्ही जिद्दीने आणि धर्याने शिवसेनेबरोबर थांबा. मी या सगळ्याचं नेतृत्व करतो .आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रमध्ये नव्या दमाने शिवसेना उभी करतो हा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना दिला.
शिवसेनेला संघर्ष, बंडखोरी नवीन नाही .गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक नेते शिवसेने मधून फुटून गेले.आणि त्याला तात्पुरता फायदा त्यावेळी झाला .पण आज त्यांची परिस्थिती काय जनमानसातल्या त्यांची प्रतिमा ही पूर्णपणे त्या ठिकाणी लयात गेली .
कणकवली तालुक्याने तीस ते पस्तीस वर्ष संघर्ष केलेला आहे श्रीधर नाईकसारखं युवा नेतृत्व त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा खासदार निवडून आणला म्हणून त्यांची दिवसाढवळ्या श्रीधर नाईकांची हत्या झाली. जो इथला कार्यकर्ता श्रीधर नाईक यांच्या विचाराचा होता तो अप प्रवृत्तीच्या विरोधात लढत राहिला. आजही तो त्याच ताकतीने उभा आहे
सत्यविजय भिसे सारखी माणसे अप प्रवृत्तीच्या विरोधात लढत होती. त्यांना त्यांनी संपवण्याचे काम ते त्या ठिकाणी झालं व्यक्ती गेल्या पण त्यांचे विचार त्याच ताकदीने या कणकवली तालुक्यामध्ये उभे आहेत ज्या अपप्रोचा विरोधात आपल्याला लढायचं आहे त्याच्या विरोधात आपण भूमिका आक्रमक घेतली पाहिजे जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी हातात घेतले पाहिजे आणि त्या प्रश्नांची शिवसेनेच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करू शकते असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे ज्यावेळी आपण हे काम करू त्यावेळी जिल्ह्याच्या सगळ्या सत्ता स्थानावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. असे शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले