*कोकण Express*
*उद्घाटनाला नको, उदय सामंतांनी किमान पोहायला तरी यावे…*
*निलेश राणेंची टीका; सावंतवाडीची जबाबदारी संजू परबांनी घ्यावी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पालकमंत्री उदय सामंत यांना उद्घाटनाला यायचे नसेल तर किमान त्यांना पोहायला तरी बोलवा, मात्र पैसे घ्या.त्यांनी आपल्या रत्नागिरीच्या पालिकेत वाट लावली. मात्र सावंतवाडीचे नगराध्यक्षांनी तब्बल पावणे चार वर्षे बंद असलेला जलतरण तलाव सुरू करून दाखवला. हा आमचा विजय आहे, अशी टीका माजी खासदार तथा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी आज येथे केली.
आगामी काळात सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी संजू परब आणि त्यांच्या नगरसेवकांनी सांभाळावी. भविष्यात लोकांना अपेक्षित असे काम करावे, आणि पुढील काळात सावंतवाडी पालिकेवर भाजपचीच सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले. श्री राणे यांच्या माध्यमातून पालिकेच्या जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, विशाल परब,नगरसेवक सुधीर आडीवरेकर,मनोज नाईक,परिमल नाईक,आनंद नेवगी,दीपाली भालेकर,महेश पाटील,मोहिनी मडगावकर,अजय गोंदावले,उत्कर्षा सासोलकर केतन आजगावकर,बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.