मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी१३९ अर्ज दाखल

मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी१३९ अर्ज दाखल

*कोकण Express*

*मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी१३९ अर्ज दाखल*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५४ जागांसाठी ही निवडणूक होत असून १३९ उमेदवारांनी निवडणूक अर्ज तहसील कार्यालयात सादर केले आहेत. सहा ग्रामपंचायत कार्यालय क्षेत्रातील १० हजार १९४ इतक्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यात ५ हजार २७८ महिला तर ४ हजार ९१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील कुणकवळे ग्रामपंचायतीच्या सात जागांवर लढत होत असून १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावात ३०९ महिला व २७४ पुरुष मतदार आहेत. गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गावात ९७१ महिला व ९२१ पुरुष मतदार मतदान हक्क बजावतील. खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी मतदान होत असून ३१ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. गावात १४३६ महिला व १३८२ पुरुष मतदार आहेत. मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून २० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गावात ५७३ महिला व ५५३ पुरुष मतदार मतदान करू शकणार आहेत. आडवली-मालडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी मतदान होत असून १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावात ५१७ महिला व ५०४ पुरुष मतदार आहेत. चिंदर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी मतदान होत असून ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. गावात १४७२ महिला व १२८२ पुरुष मतदार आहेत. सद्यस्थितीत सहा ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा तर दोन ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत सत्ता होती. तालुक्यात शिवसेनेकडून नुकतीच शिवसेना सदस्य नोंदणी गावागावात झाल्याने शिवसेनेची हवा आहेच, मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने मेहनत घेतली आहे. सहा ग्रामपंचायतींच्या ५४ इतक्या जागांसाठी इच्छुक उमेदवार आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे १५ डिसेंबरपासून सुरू झालेला गावच्या सत्तेच्या सारीपटाची ४ जानेवारीला उमेदवार निश्चिती होऊन नेमकी लढत कोणाशी होणार? हे स्पष्ट होणार आहे. नव्या वर्षातील पहिल्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. १५ जानेवारीला मतदान तर १८ रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी सरपंच निवड जनतेतून नसून निवडून आलेल्या उमेदवारांमधून आरक्षणनिहाय होणार आहे. शिवसेनेला गड मजबूत राखण्याचे तर भाजपला अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान असेल. तर अन्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!