*कोकण Express*
*”रक्ता पलिकडचं अनोख नातं… मैत्रीचं”! जपणारा मैत्री परिवार…!!*
*कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे गेटटुगेदर हापूस रिसाॅर्टमध्ये साजरे*
*कासार्डे ; संजय भोसले*
कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे तिसरे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रत्नागिरी जवळील तोणदे येथील निसर्गरम्य ठिकाणी हापूस ॲग्रो रिसाॅर्टमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.मैत्री परिवाराचे हे सलग तिसरे दोन दिवसांचे गेट टुगेदर चांगलेच यादगार ठरले.
मैत्री परिवारातील सर्व मित्रमैत्रिणींना एकत्रित आणून सर्वांना भेटता यावे.रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करता यावा.तसेच आनंदाचे क्षण मनसोक्तपणे एकत्रितपणे घालविता यावेत.जेणेकरुन त्यातून जीवनामध्ये नवीन उर्जा मिळेल,उत्साह निर्माण करता व्हावा हीच या मागील संकल्पना आहे.पण म्हणतात ना मैत्रीची ओढ कधी स्वस्थ बसू देत नाही.त्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींना तिसऱ्या गेटटूगेदरचे वेध लागले होते आणि मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते.
काहींनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत ती उत्तमपणे पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यात प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर,संजय खानविलकर,विशाखा वळंजू,समीता मुंज,जयराम डामरे यांनी विशेष मेहनत घेतली.मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,कोल्हापूर तसेच अन्य ठिकाणाहून व जिल्ह्यातील विविध भागामध्ये नोकरी,धंदा,व्यवसाय यामध्ये बिझी असणाऱ्या मित्रमैत्रिणी निव्वळ मैत्रीच्या ओढीने एकत्रित झाल्या होत्या.सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी काही मित्र-मैत्रिणींनी सर्वांशी संपर्क साधून मैत्रीसेतू बनण्यासाठी आग्रही भूमिका बजावली.
कार्यक्रम स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.विशेषता महिलांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.चहा,नाश्ता,जेवण यामध्येही वैविध्यता ठेवण्यात आली होती.तसेच कणकवली वरुन नियोजित रत्नागिरी- तोणदे याठिकाणी येण्याजाण्यासाठी काही मित्रांनीच आपली चारचाकी वाहनांची सोय केली होती.
पहिल्या दिवसाची सुरुवात शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता खाडीमध्ये बोटीतून बोटिंगची सैर करण्यात आली.बोटींगमध्ये देखील गाण्याच्या भेंड्यांचा आनंद सर्वांनी घेतला.त्यानंतर वर्षभरात ज्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस झाले त्या सर्वांचा एकत्रितपणे वाढदिवस मैत्री परिवाराचा केक कापून साजरा करुन आणि गुलाब पुष्पाच्या रोपाची कुंडी भेट म्हणून देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर कराओके मराठी,हिंदी गाण्याची सुरेल मैफिल रंगली होती.तर अनेकांनी गाण्यांच्या ठेक्यावरती नाचण्याचा आनंद घेतला.
त्यानंतर प्रत्येकाने आपली स्वतःची ओळख,व्यवसाय आणि राहण्याचे ठिकाण याविषयीचा ओळख परेड राऊंड झाला.
त्यानंतर महेंद्र सांब्रेकर,सरिता काणेकर,विजयश्री कोदे,शंकर गोसावी,विशाखा वळंजू-कोळवणकर,साधना मुंज,अर्चना मोरजकर,मंगेश वाळिंबे यांनी सुंदर गाण्याची पेशकश सादर करुन सर्वाची मने जिंकली.तसेच अर्चना मोरजकर हीने शिट्टीवरती गायलेले सुंदर गाण्याने आपल्यातील वेगळ्या कलेची चुणूक दाखवून दिली.
रात्री खरी रंगत आणली ती मैत्री परिवारातील मित्र अजित लाड,जयराम डामरे,अजय वाळके,संजय सावंत आणि शंकर गोसावी,प्रदिप धुरी अप्रतिम दशावतारी नाटक वेशभूषेसह सादर करुन सर्वांनाच पोट धरून हसायला लावले.त्यांना संतोष दळवी,संतोष गरुड आणि गंभाजी राणे यांनी संगीत साथ दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय वाळके यांनी केले.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात गप्पागोष्टी मारत फिरण्याचा आनंद,माॅर्निंग वाॅकने झाली.तसेच व्हाॅलीबाॅल,क्रिकेट,स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्याचा व खेळण्याचा आनंद घेतला.प्राचीन मंदिर श्री देव लोटेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
सकाळी विविध मनोरंजक फनी गेम्स खेळविण्यात आले.तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.यामध्ये चर्चा करून पुढील दिशा व रुपरेषा ठरविण्यात आली.
दोन दिवस आपल्या रोजच्या व्यापातून व ताण तणावातून मुक्त होत आनंदात,मजेत,धमाल मस्तीत गेल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.दुसऱ्या दिवशी सायंकाळी सर्वांनाच आपआपल्या घरी परत जाण्यासाठी परतीचे वेध लागले.पुढच्या वर्षी असेच पुन्हा एकदा भेटण्याचा निश्चय करून सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाले.
*”रक्ता पलिकडचं नातं…मैत्रीचं”* असा मैत्रीचा संदेश देणारा हा मैत्री परिवार खरचं सर्व मित्रमैत्रिणींच्या सुख,दु:खात सहभागी होऊन कौटुंबिक नातं जोपासतोय हे विशेष म्हणावे लागेल.या गेटटूगेदरमध्ये मैत्री परिवारातील पंचावन्न मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते.