उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला तुळसुली गावात खिंडार

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला तुळसुली गावात खिंडार

*कोकण Express*

*उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला तुळसुली गावात खिंडार*

*शेकडो शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

एखाद्या राजकीय पक्षात काम करत असताना आपण सर्वस्व देत असतो जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडताना अनेक वेदना होत असतात पण अन्याय होत असताना तो गप्प सहन करणे जमत नाही म्हणूनच आपण पक्ष सोडतो असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी सांगून गेल्या ९ वर्षात खासदार व आमदार यांनी कोणत्याही प्रकारची विकास कामे न करता गावागावांमध्ये वाद लावण्याचे काम केले आहे. असा आरोपही त्यांनी तुळसुली येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात केला.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील शेकडो शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला.कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटातील शेकडो शिवसैनिकांनी भाजप पक्षात प्रवेश केला या गावांमध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार निलेश राणे तालुकाध्यक्ष विनायक राणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, राजा धुरी, एड. बंड्या मांडकुलकर, रुपेश कानडे, सोसायटीचे अध्यक्ष भा. के. वारंग, साधना माडये, बंड्या सावंत, विजय कांबळी, भाजपा गटनेत विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, एड. राजू कुडाळकर, नागेश आईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुळसुली येथील उपविभाग प्रमुख व माजी उपसरपंच विजय वारंग यांच्या सह शेकडो शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला यामध्ये साळगाव पंचायत समिती गटाचे उपविभागीय अध्यक्ष श्री. विजय वारंग यांनी सोबत उप शाखाप्रमुख हरिश्चंद्र माईंनकर, बूथ प्रमुख शिवराम वारंग, बूथ प्रमुख शशिकांत नाईक, शाखा प्रमुख राजन सहदेव वारंग, शाखा प्रमुख महेश वेंगुर्लेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्वेताली नाईक, मनोहर वारंग, संतोष तुळसुलकर, माधवी माईंनकर, प्रशांत तुळसुलकर, संजना वेंगुर्लेकर, बंड्या वारंग, श्रीकृष्ण धुरी, एकनाथ वारंग, महेश मेस्त्री, जयराम वारंग, विजय वारंग, भिकाजी जाधव, महेश वारंग, प्रणील वारंग, रमेश वारंग, अरविंद वारंग, सुमित मेस्त्री, कांचन सावंत, साई चव्हाण, धनंजय वारंग, बाबू वारंग, सुभाष वारंग, सुरेश वारंग, प्रमोद वारंग आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की, तुम्ही भाजप पक्षावर आणि आमच्यावर जो विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे त्या बद्दल तुमचे स्वागत करून तुमच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू जुना पक्ष सोडून नव्या पक्षात प्रवेश करताना होणाऱ्या वेदना मोठ्या असतात पण ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी पर्याय नसतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात असे सांगून आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले आहेत पण या दोघांनी कोणत्याही प्रकारची विकास कामे केलेली नाहीत मात्र प्रत्येक गावात दोन गट करण्याचे काम केले आहे असे सांगून पूर्वी या जिल्ह्यात येणारा निधी मोठ्या प्रमाणावर होता आता तो येत नाही कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्रिमंडळात होते त्यावेळी अधिकारी घाबरत होते सिंधुदुर्गात निधी इतरांप्रमाणे येत होता पण २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव झाला विकास करणाऱ्या व्यक्तींचा येथे पराभव केला जातो असे प्रकार घाटमाथ्यावर दिसत नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार यांचे पराभव होत नाही. त्यांच्याबद्दल अनेक चर्चा होतात पण त्या ठिकाणची जनता त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे राहते मात्र या ठिकाणी विकास करणाऱ्या विरोधात जनता राहते असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगून तुम्ही ज्या अपेक्षेने आला आहात त्या अपेक्षा आम्ही निश्चित पूर्ण करू गावाच्या विकासासाठी निधी देऊ असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!