*कोकण Express*
*कठीण काळामध्ये शिवसेनेला मिळालं यश कौतुकास्पद- संदेश पारकर*
खरंतर कणकवली तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसैनिक लढला आणि या तालुक्यांमध्ये जे यश मिळवलं त्यामुळे आपण या सर्व कौतुकास पात्र आहात कणकवली तालुका म्हटलं की राणे समर्थकांचा बालेकिल्ला असं चित्र त्या ठिकाणी उभं केलं जातं पण आपण या 2022 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जनतेने आपल्याला साथ दिली शिवसैनिक त्या ठिकाणी लढले आणि ज्या गावागावांमध्ये शिवसेनेचा सरपंच उपसरपंच बसला तसेच प्रत्येक ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकला तालुक्यातील काही गाव आहेत त्या गावांमध्ये शिवसैनिक आणि राणे भाजप यांच्यामध्ये लढत झाली पूर्वी जी मतांमध्ये फरक होता आणि आताच्या मतांमध्ये फरक टोकापर्यंत येऊन राहिलेला आहे यामध्येही जोरदार लढाई झाली आणि थोड्याफरखाने आमचा पराभव झाला त्याच पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये यश सुद्धा प्राप्त केलं
शिवसेना संपली म्हणून सांगणाऱ्यांसमोर आपण सर्वांनी हे आव्हान पेललं आहे आणि जे शिवसेना संपले म्हणून सांगतात त्यांना पुरून उरणारा माझा शिवसैनिक आहे येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याच पद्धतीने जोरदार काम आपल्याला करायचा आहे आणि विरोधकांना पराभूत करण्यासाठी मानसिकता स्वीकारून ही लढाई आपल्याला लढावी लागणार सत्ता होती त्यावेळी आपण खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांच्या माध्यमातून केलेली आहेत परंतु आता शिवसेनेची सत्ता नाही म्हणून आपल्याला असेल त्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत निवडणुका लढवाव्या लागतील असेल त्या परिस्थितीमध्ये जो लढतो त्यालाच निवडणुकीमध्ये यश येतं आणि यामध्ये मिळालेल्या याच्याबद्दल त्याचा आत्मविश्वास निर्माण होतो
अनेकदा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला शिवसेनेमध्ये गद्दारी केली गेली अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं .राणे भाजप, भाजप शिंदे गट या यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला हे सगळे मिळून शिवसेना संपवायला निघाले असले तरी जनतेमध्ये असलेलं शिवसेनेचं प्रेम आहे ते अभाधित ठेवलेल आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण यश मिळवणारच आहोत या मतदारसंघांमध्ये सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे या पदीचं काम आपण सर्वांनी करायचा आहे
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही पदाधिकारी पोचलो नसलो तरी शिवसैनिकांनी फॉर्म भरण्यापासून उमेदवारी देण्यापर्यंत सर्व शिवसैनिकांनीच केला आहे प्रत्येक शिवसैनिकांनी ठरवलं होतं गावांमधील राणे भाजप आहे त्यांना चारी मुंड्या चीत करायचं असा संकल्प शिवसैनिकांनी केला होता काही झालो तरी ही निवडणूक लढवणार अशा पद्धतीने ही निवडणूक लढवली गेली म्हणून या सर्व कठीण काळामध्ये शिवसेनेला विश्वास दिला
ज्या ग्रामपंचायती शिवसेनेकडे निवडून आल्या आहेत त्यांना खासदार विनायक राऊत यांनी खासदार निधीच्या माध्यमातून निधी द्यावा शिवसेनेकडे आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आपण पाळून गावचा विकास करू शकतो असा विश्वास सरपंच सदस्य यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल असे शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले यावेळी कणकवली तालुका शिवसेना नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत शिवसेना नेते अतुल रावराणे जिल्हाध्यक्ष संजय पडते शैलेश भोगले प्रथमेश सावंत उपस्थित होते