*कोकण Express
*सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ अनामिका जाधव यांना एकाधिकारशाही नडली*
*माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही ही गुर्मी आली अंगाशी*
*वेळ प्रसंगी एक छोटी मुंगी सुद्धा बलाढ्य हत्तीला सैरावैरा पळवते
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पी-डब्ल्यू-डी हे भ्रष्टाचाराचे कुरण मानले जाते मात्र या ठिकाणी अधिकारपद सांभाळणारे अधिकारी कर्तव्यदक्ष व प्रामाणिक असले तर अशा भ्रष्टाचाराला शंभर टक्के फाटा मिळतो, सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यावेळचे कार्यकारी अभियंता शिरसेकर, शिंदे सुरेश बच्चे पाटील यांनी या बांधकाम विभागाची उंची वाढवली व चांगले काम करून घेतले, सर्वांना समान वागणूक दिली हा माझा- तो तुझा हा भेदभाव बाळगला नाही, जो चांगले काम करेल तो कंत्राटदार माझा या तत्त्वाने ते वागले त्यामुळे त्यांच्या पश्चात ते निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. मात्र मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागात आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागून हा माझे काय वाकडे करणार? तो माझे काय बिघडवणारा? अशी दर्पोक्ती करुन मी कोणाला जुमानत नाही अशा प्रकारची भाषा वापरून सर्वसामान्य ठेकेदाराला मेटाकुटीला आणले होते तर आपल्या बगलबच्चेच्या बाजूने निर्णय दिले होते.
याबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले,आपण लोकांचे सेवक आहोत हे विसरून तू माझ्या केबिन मध्ये यायचे नाही,तुझा येथे संबंध काय अशा प्रकारचे भाषा सर्वसामान्य छोट्या कंत्राटदारांना वापरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना ही एक प्रकारे शासनाने दिलेली चपराक आहे व पारदर्शक शासनाचा हा एक नमुना आहे, त्यासाठी आम्ही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानतो.
सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता या पदावर सो अनामिका जाधव रुजू झाल्यानंतर काही महिन्यातच त्यांच्याविषयी सर्वसामान्य ठेकेदारांमधून नाराजीचा सूर उमठू लागला, त्यासाठी आपल्याच मर्जी ठेकेदारांना कामे देणे,मन मानेल तसे वागणे, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर केले गेले, प्रशासकीय कामाबाबतही आरोप झालेत, याबाबत आम्ही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर माझा मीत्र असलेल्या एका ठेकेदारासमोर माझ्या विरोधात लिहिणाऱ्या सदर पत्रकाराला, संपादकाला माझे पुण्यातील गुंड येऊन कधीच गायब करू शकतात.. मी काय करू शकते हे त्यांना माहिती नाही अशा प्रकारची धमकीच दिली होती.गेली 32 वर्षे पत्रकरिता करत असताना अशा अनेक धमक्या आम्ही ऐकल्या, बघितल्या ,त्यांना आम्ही कधीच भीक घातली नाही व यापुढे घालणार नाही, त्यामुळे हे प्रकरण आम्ही गंभीर्याने घेतले नव्हते,मात्र सदरच्या अधिकाऱ्यांची हिम्मत अधिक वाढू नये यासाठी संबंधितांविरोधात आम्ही शासन दरबारी पत्रव्यवहार केला व लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली, आम्हाला विश्वास होता की राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर याची निश्चितच गांभीर्याने दखल घेतील व आम्हाला न्याय देतील.
खरंतर अशा धमक्यांकडे आम्हाला कधीच गांभीर्याने पाहायची गरज नव्हती, मात्र माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशी दर्पोक्ती करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला वठणीवर आणणे ही काळाची गरज होती व एक सर्वसामान्य माणूस सुद्धा योग्य कागदपत्राच्या आधारे काय करू शकतो हे दाखवून द्यायचे होते म्हणून संबंधितांविरुद्ध उठाव करणे आम्हाला कम प्राप्त ठरले.
याबाबत अनेक जणांनी आमच्याकडे विचारणा केली तुम्ही आता काय करणार? त्यावेळी त्यांना आम्ही एकच सांगितले गेली 32 वर्षे पत्रकारिता करत असताना आम्ही अनेक लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून आहोत, त्यामुळे आम्ही चुकीचे वागणार नाही व चुकीचे काही करणार नाही याचा विश्वासही संबंधित लोकप्रतिनिधींना व अधिकाऱ्यांना आहे,त्यामुळे एखाद्या गोष्टीची आम्ही तक्रार केली तर त्याची निश्चितच दखल घेतली जाईल थोडा वेळ थांबा आपल्याला रिझल्ट दिसेल असे मी अनेक जणांना सांगितले होते.
पत्रकारिता करत असताना व परखड लिहीत असताना अनेक जणांनी मला हरेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु पाटेकरच्या या पवित्र भूमीत 365 खेड्यांचा रखवालदार उपरलकर यांच्या सुरक्षा कवचामुळे आमचे कोणीच काही वाकडे करू शकले नाही,ज्यांनी ज्यांनी आमच्या विरोधात खोट्याचा मार्ग अवलंबून त्रास देण्याचा प्रयत्न केला ते ते आपल्या कर्माने संपले हा इतिहास आहे, कारण आमचा मार्ग सत्याचा आहे, सत्य परेशान हो सकता है पराजित नही हे आम्हाला माहिती होते, त्यामुळे आम्ही निर्धास्त राहिलो.
गेल्या 32 वर्षाच्या पत्रकारितेत तीन वेळा राजकीय हल्ले झालेत, पण आम्ही कुठे डगमगलो नाही, गांजा, चरस ,अवैध दारू वाहतूक यावर लिखाण करत असताना अनेकांनी मला प्रेमाचा आपुलकीचा सल्ला दिला ,की अशा लोकांच्या नादी तू लागू नकोस हे लोक भयानक आहेत,कधी काहीही करू शकतील मी त्यावेळी माझ्या या मित्रांना एकच सांगितले मला शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एक दिवस जगायला निश्चितच आवडेल, लाचारी आमच्या रक्तात नाही, त्यामुळे कोणासमोर आम्ही नाहक गुडघे टेकणार नाही, चे असत्य आहे समाजाला घातक आहे, त्याच्या विरोधात लिहिणारच अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत.
आम्ही अशा प्रकारचे हे लिखाण करतो म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रयस्थामार्फत धमकवण्याचा प्रयत्नही केला ,त्यांनाही माहित होते की आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही व घालणारही नाही, आम्ही सरळ मार्गाने अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढा उभारु व लढू मोडेन पण वाकणार नाही हे आमचे तत्त्व आहे ते तत्व आम्ही कधी गहाण ठेवणार नाही,हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे,आपण जनतेचे सेवक आहोत हे ज्यावेळी एखादा अधिकारी विसरतो व मुजोरीने वागतो त्यावेळी त्याच्या घटका भरत आलेल्या असतात व आम्ही जनतेचे सेवक आहोत हे जाणून जो अधिकारी काम करतो,त्याला श्री देव पाटेकरचा शंभर टक्के आशीर्वाद मिळतो व तो अधिकारी सावंतवाडीत नाव कमावून जातो हा सावंतवाडीचा इतिहास आहे, व हा इतिहास अनेक वेळा माझ्या लेखातही सांगितला आहे, या सावंतवाडीत करोडपतीचे रोडपती झालेले आम्ही याची डोळा पाहिले आहे, ही आमची भगवंताची किमया आहे ,त्यामुळे लीणतेने जे वागले ती व्यक्ती राजकीय असो अथवा शासकीय असो ती उच्च पदावर गेली व ज्यांनी उद्दाम पणा केला ती मातीमोल झाली हा या भूमीचा इतिहास आहे त्यामुळे या भूमीचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने लिणतेने वागून आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेची सेवा करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला इथपर्यंत आणून ठेवले आहे, हे जाणून काम केले तर सावंतवाडी कोणालाही त्रासदायक नाही, मात्र कोणाच्यातरी नादाला लागून उद्दाम पणा केला तर पाटेकरच्या काठीला आवाज नाही मार मात्र शंभर टक्के बसणार व तो बसला ही.