कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया

*कोकण Express*

*कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया*

वाढदिवसानिमित्त कणकवलीत पालकमंत्री उदय सामंत यांचेआवाहन

*कणकवली ः प्रतिनिधी*

राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने येथील श्रीधर नाईक चौकात श्री. सामंत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार व शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी श्री. सामंत बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळकर, संजय आग्रे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक, सुशांत नाईक, शैलेश भोगले, संदेश पटेल, गितेश कडू रामू विखाळे, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, राजू राणे, नीलम सावंत, मंगेश सावंत, हर्षद गावडे, सुमेधा अंधारी, मानसी मुंज, माही परूळेकर, साक्षी आमडोस्कर, राजू राणे, राजू राठोड, सुजित जाधव, राजू शेट्ये, दिगंबर पाटील व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आपला वाढदिवस रत्नागिरी जिल्ह्यात साजरा होत होता. रत्नागिरी माजी कर्मभूमी असली तरी आज पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्या जन्मभूमी मध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे, याचे समाधान आहे. पुढील वर्षभरात या जिल्ह्यात आपण सांघिक पणे एवढं काम करूया की पुढील वर्षी आदी सिंधुदुर्गमध्ये वाढदिवस साजरा करूया मग रत्नागिरीत जा, असे आपण म्हणाल असे सांगताना आपण केलेल्या सत्काराचा पश्चाताप होणार नाही, याची ग्वाही आपण देतो असे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.
येथील स्व. श्रीधर नाईक पुतळ्याच्या समोर आपला सत्कार सोहळा होत आहे. त्यांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले ते आपण सर्वांनी पूर्ण करूया हीच त्यांना आदरांजली व आपल्या वाढदिवसाचा संकल्प आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!