*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल माफी द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल*
*शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांचा सरकारला गंभीर इशारा..*
*टोलच्या नावाखाली होणारी जिल्हावाशीयांची लूट थांबवावी*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल मुक्ती मिळण्यासाठी शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते .शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ओसरगाव टोल नाक्यावर जिल्ह्यातील एम एच झिरो सेवन गाड्यांना टोलमुक्ती मिळण्यासाठी शिवसेनेने आज आंदोलन केले.
खरं तर पाच महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी टोल मुक्ती मिळावी त्यासाठी हे शिवसेनेचे आंदोलन आहे शिवसेना खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्या माध्यमातून आम्ही ही लढाई लढत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा बसवलेला जो टोल आहे तो जिल्ह्यासाठी जाचक आहे. जवळजवळ या टोलमुळे जिल्ह्याचे विभाजन होत आहे चार तालुक्यांना मोठा फटका बसत आहे . जिल्ह्याचे मुख्य कार्यालय ही वरस या ठिकाणी असल्यामुळे देवगड वैभववाडी कणकवली मालवण या भागातील नागरिकांना या मार्गावरून येजा करावी लागणार आहे त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना शेकडो रुपयांचा भुर्दंड बसणार आहे तसेच देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण सर्वाधिक तालुक्यांना बसणार आहेत.आणि हा टोल जाचक आहे .म्हणून या जिल्ह्यातून टोलमुक्ती मिळावी हा शिवसेनेचा लढा आहे
खरंतर एम एच झिरो सेवन च्या गाड्यांना जायला आणि यायला वेगळा रस्ता द्यावा अशी आमची शिवसेनेची मागणी आहे त्याचप्रमाणे टोल माफी देखील व्हावी अजूनही मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसून त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पाच-पाच वर्षे जमिनी देऊन मोबदला मिळत नाही .राज्य किंवा केंद्र सरकार डबल देणार अशी सेनेने भूमिका मांडली .त्यामुळे जिल्ह्यातील एम एच झिरो सेवन च्या गाड्यांना टोल मुक्ती मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेचा लढा हा सुरू राहणार आहे पोलिसांनी प्रशासनाने याबाबत सविस्तर बैठक लावून योग्य तो निर्णय करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे