कणकवली कॉलेजमध्ये होणार करिअर ॲकॅडमिची स्थापना- डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली कॉलेजमध्ये होणार करिअर ॲकॅडमिची स्थापना- डॉ. राजश्री साळुंखे

*कोकण Express*

*कणकवली कॉलेजमध्ये होणार करिअर ॲकॅडमिची स्थापना- डॉ. राजश्री साळुंखे*

 

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली कॉलेज ज्युनिअर विभाग व व्यावसायिक विभाग यांचा इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या एच. पी. सी. एल. सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 16/10/2022 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यार्थी, शिक्षक, पालक मेळावा संपन्न झाला. मंचावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुखे, मार्गदर्शक डॉ. संदिप साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, पर्यवेक्षक प्रा. मंगलदास कांबळे, कोल्हापुर येथील ॲकॅडमिचे मार्गदर्शक डॉ. अमोल पाटील, प्रा. संदिप पाटील, श्रीकांत कांबळे, पालक प्रतिनिधी गंगाराम गोरे, पटेल मॅडम, जुई वळंजू मॅडम, भाट, नाईक मॅडम उपस्थित होते. मेळाव्याची सुरूवात शिक्षण महर्षी, संस्थापक, चेअरमन कै. केशवराव राणे यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन झाले. त्यानंतर L.C.D. प्रोजेक्टरवर महाविद्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांची चित्रफित दाखविण्यात आली.

डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी बौध्दिक प्रगतीबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावा. महाविद्यालयामार्फत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा. नियमित अभ्यासाबरोबर ग्रंथालयातील संदर्भ पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी वाचनात अंतर्भाव करावा. डॉ. सदिप साळुंखे म्हणाले आधुनिकीकरणामध्ये बदलत्या प्रवाहाबरोबर विद्यार्थ्यांनी सुध्दा परिवर्तनाची कास धरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययन अध्यापन यात येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणण्याचे आवाहन केले. प्रा. अरुण चव्हाण, प्रा. विजयकुमार सावंत यांनी वाणिज्य, कला व व्यावसायिक शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. भविष्यात हे विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रात प्रवेश व प्राविण्य मिळवू शकतात. याबद्दल मार्गदर्शन केले.

विज्ञान विभागासाठी विद्यार्थी व पालकांच्या खास आग्रहास्तव एखाद्या ॲकॅडमीतून विशेष मार्गदर्शन व्हावे. या संदर्भात मेळाव्यात सकारात्मक चर्चा झाली. उपस्थितांपैकी कणकवलीतील योग प्रशिक्षक डॉ. तुळशीराम रावराणे कुटुंबियांनी महाविद्यालयास चेक स्वरुपात देणगी चेअरमन यांच्याकडे सुपुर्द केली. आपल्या मनोगतात ते म्हणाले, आपल्या पाल्याला व पुढील पिढीला चांगले शिक्षण मिळण्यासाठी पालकांनी यथाशक्ती महाविद्यालया मदत करण्यास पुढे यावे. असे प्रतिपादन केले.

विज्ञान विभागासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. अमोल पाटील (सांगली) म्हणाले, विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे. परंतू योग्य दिशा व मार्गदर्शक त्यांना आवश्यक आहे. तसेच प्रा. संदिप पाटील यांनी 1.I.T, NEET, CET, JEE, या स्पर्धा परिक्षांबद्दल विशेष मार्गदर्शन केले. प्रा. श्रीकांत कांबळे (इचलकरंजी) यांनी परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमानुसार समायोजन करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमामध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे, असे मत मांडते. तसेच पालक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली. प्रास्ताविकमध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आढावा घेतला. तसेच गोरगरीबांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच महाविद्यालयाचा ध्यास आहे, असे प्रतिपादन केले. लिपिक मंगेश आरेकर यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू व सर्व संस्थापदाधिकारी यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन प्रा. मीना महाडेश्वर व प्रा. सुषमा कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. राजाराम अमृते यांनी केले.

मेळाव्यास सर्व शाखेतील पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात शिक्षक, पालक मेळावा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!