तळेरे येथील रिक्षा व्यावसायिकाला लुटमारीच्या प्रकारामुळे सर्व रिक्षा व्यावसायिकांनी जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज

तळेरे येथील रिक्षा व्यावसायिकाला लुटमारीच्या प्रकारामुळे सर्व रिक्षा व्यावसायिकांनी जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज

*कोकण Express*

*तळेरे येथील रिक्षा व्यावसायिकाला लुटमारीच्या प्रकारामुळे सर्व रिक्षा व्यावसायिकांनी जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज*

*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांचे आवाहन*

*कासार्डे ; संजय भोसले*

तळेरे येथील रिक्षा व्यावसायिकाच्या बाबतीत घडलेला लुटमारीचा प्रकार लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा व्यावसायिकांनी तसेच कोकण विभागातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी या घटनेवरून बोध घेऊन नेहमीच जागरूक आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी रिक्षाचालक व मालक यांना केले आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी,रायगड,ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी तसेच शहरी भागात असंख्य रिक्षा चालक-मालक गेल्या अनेक वर्षांपासून इमानी इतबारे व प्रामाणिकपणे आपला रिक्षा व्यवसाय करुन त्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.या व्यवसायातील अनेक संकटांचा तसेच शासनाच्या असंख्य जाचक अटींचा सामना करत प्रवासी वाहतूक करणारी सेवा करीत आहे.पण काळानुरूप बदलाचा फटका रिक्षा व्यावसायिकांना देखील सोसावा लागत आहे.त्यातदेखील अनेक संकटे आवाचून समोर उभी आहेत.

या सगळ्यावरती समर्थपणे मात करून रिक्षा व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे.पण तळेरे येथील रिक्षा व्यावसायिकाच्या बाबतीत घडलेला लुटमारीचा प्रकार खरोखरच धक्कादायक म्हणावा लागेल.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रिक्षा व्यावसायिकांनी अधिक जागृत आणि सतर्क होण्याची गरज आहे.आपल्या रिक्षा मध्ये येणारे अनोळखी प्रवासी गाडीमध्ये प्रवास करण्यासाठी येत असेल तर आपल्या स्टॅन्ड वरील रिक्षा चालकांना त्याची कल्पना द्यावी तसेच अनोळखी प्रवासी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ,प्रसाद,पिण्याचे पाणी,थंड पदार्थ आपण घेऊ नये.त्याचप्रमाणे संशयित प्रवासी वाटल्यास रिक्षा संघटनेचे पदाधिकारी किंवा जवळचे पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा.तसेच आपण भाडे कुठे घेऊन जात आहात याची माहिती आपल्या घरी कुटुंबीयांना किंवा रिक्षा स्टॅन्डवरील आपल्या सहकारी रिक्षा चालकाला त्याची कल्पना द्यावी.

सदरचे जोडपे हे रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड,ठाणे या कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये रिक्षाचालकांना गंडा घालून लुटमार करण्याच्या उद्देशाने वावरत आहे.त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन आपला व्यवसाय करावा.तसेच या जोडप्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास रिक्षा संघटनेच्या खालील पदाधिकाऱ्यांशी संतोष नाईक मोबाईल नंबर ९४०५२८८१८८ /९१४६२८८१८८ किंवा सुधीर पराडकर ९४२३८१९६१६ यांच्याशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन कोकण विभागीय रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!