*कोकण Express*
*खेड्याचा विकास हाच खरा देशाचा विकास*
*ब्रिगेडियर सुधीर सावंत*
खेड्याकडे चला हा महात्मा गांधींचा मंत्र खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधतो. असे प्रतिपादन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले. ते फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *समृद्ध आणि आदर्श गाव* या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या वेळी श्री. करंदिकर म्हणाले की आपण नैसर्गिक शेती केली पाहिजे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे आपण लक्ष दिले पाहिजे.आपले गाव समृद्ध केले तरच देश समृद्ध होईल. आनंदी गाव ही संकल्पना राबवली पाहिजे. असे मत व्यक्त केले.
आपल्या प्रमुख मार्गदर्शनात ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की निसर्गाने भरभरून दिलेल्या सुंदर गावात आज यायला मिळाले याचा आनंद होतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच वाचन केले पाहिजे. मी तसे केल्याचा फायदा गुप्तहेर म्हणून व खासदार म्हणून काम करताना झाला. जगाची खडानखडा माहिती मुळे तंत्रज्ञानाचे प्रणेते स्वर्गीय राजीव गांधी यांना दिल्यामुळे मी त्यांचा लाडका झालो. जगातले पहिले सैनिक आणि पहिले शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्यामुळे आपण आहोत सर्वजण सुखी समृद्धी बद्दल बोलतात. पण आनंदी जीवनाबद्दल कोणी बोलत नाही. सामान्य नागरिक खूप काही करू शकतो हा आत्मविश्वास असला पाहिजे ते माहित नाही ते निर्धास्थपणे विचारणे हीच खरी ही आत्मविश्वासाची पहिली पायरी.
आपल्यातील दुही गुलामगिरीकडे नेणारा मार्ग असतो. कायद्याच्या पलीकडे हा देश चालतो. गरिबी आणि श्रीमंती यातील दरी देशाच्या विकासाचा घातक आहे. शेतकरी समृद्ध आणि आनंदी जीवन जगला पाहिजे प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळे असते. नैसर्गिक जीवनात खूप मोठी ताकद असते. केमिकल खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आरोग्य नीट तर सर्व काही फिट. असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले.