*कोकण Express*
*आमदार दीपक केसरकर यांना आवरा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिंदे- फडणवीस यांच्याकडे मागणी*
*शिंदे गटात गेल्यानंतर प्रत्येक आमदाराचे स्वागत झाले तुमचे का झाले नाही याचे आत्मपरीक्षण करा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांना आवरा. ते नको ती आणि चुकीची विधाने करत आहेत त्यांना वेळीच आवर घाला अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर केसरकर यांनी बोलू नये, आमच्या नेत्याने काय बोलावे काय करावे याचे अधिकार त्यांना आहेत.त्यांच्यावर बोलणारे तुम्ही कोण ? केसरकर यांनी स्वतःच्या मतदारसंघात जनतेने साधे स्वागत सुद्धा केले नाही याचे आत्म परीक्षण करावे. शिंदे गटातील ३९ आमदारांचे भव्य स्वागत आणि जाहीर मेळावे त्याच्या जिल्हात झालेत. केसरकर हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचे मतदारसंघात स्वागतही झाले नाही. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हजारो कोटींची कामे शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदार संघात नेली. केसरकर यांना त्यापैकी एकही रुपयाचा निधी जिल्ह्यात किंवा मतदार संघात आणता आला नाही. असे असताना स्वतःचे अपयश लपवण्यासाठी नको ती वक्तव्य करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केसरकर यांनी करू नये असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कणकवली येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते. राजन तेली म्हणाले केसरकर प्रवक्ते असतील मात्र ते त्यांच्या गटाचे आहेत, ते भाजपचे नाही. ज्या पद्धतीने काही विषयांवर गरज नसताना ते बोलत आहेत तो प्रकार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तोंडावर चुकीचां आहे. त्यामुळे केसरकर यांना आवर घातला पाहिजे.म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने निवेदन दिले जाणार आहे. राज्यात सत्ता बदल व्हावा अशी जनतेची अपेक्षा होती.तो झाला आणि शिंदे – फडणवीस सरकारने पेट्रोल वरील कर कमी केला, शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले,नवनवीन योजना सुरू केल्या. त्यामुळे राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना, जनता आणि सामान्य माणूस सुखी असताना.आमदार केसरकर हे नको त्या विषयाला हात घालून चांगले विषय जनतेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे. केसरकर यांना भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा केसरकर यांना सुनावलेले आहे. त्यामुळे वेगळे स्टेटमेंट करण्यापेक्षा दुरावलेल्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा असा सल्लाही यावेळी तेली यांनी दिला.
आमदार केसरकर यांना शिवसेनेचा बराचसा इतिहास माहित नाही. १९९९ मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सावंतवाडीतून मला उमेदवारी जाहीर केली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या आगे पीछे असणाऱ्या लोकांनी शिवराम दळवी यांना आयत्यावेळी उमेदवारी द्यायला भाग पडली. त्याला दत्ता दळवी अताचे खासदार विनायक राऊत यांनी खतपाणी घातले.हा इतिहास शिवसेनेचा आहे. तो पडताळून घ्यावा आणि मग राजकारण करत बसावे. सरकार आले त्या संधीचा फायदा मतदार संघाचा जनतेला करून द्यायचा की अशीच वक्तव्य करत बसायचे हे केसरकर यांनी ठरवावे असे ही तेली म्हणले.