नडगिवे ग्रामपंचायत व खारेपाटण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून *हर घर तिरंगा” जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न

नडगिवे ग्रामपंचायत व खारेपाटण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून *हर घर तिरंगा” जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न

*कोकण Express*

*नडगिवे ग्रामपंचायत व खारेपाटण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून *हर घर तिरंगा” जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न*

*खारेपाटण ःःप्रतिनिधी* 

जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून” हर घर तिरंगा” उपक्रमाला उत्साहपूर्ण लोकसहभाग मिळावा म्हणून रॅली, पथनाट्य, डोअर टू डोअर भेट व मेळावा घेऊन जनजागृती करण्यात आली.

भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व विभागीय सहसंचालक उच्च विभाग, कोकण विभाग, पनवेल आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशनानुसार खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या स्वयंसेवकांनी हर घर तिरंगा उपक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने लोकसहभाग मिळावा या मुख्य उद्देशाने मुंबई विद्यापीठ दत्तक गांव नडगिवे येथे रॅली, पथनाट्य, डोअर टू डोअर भेट व मेळाव्याचे आयोजन करून जनजागृती केली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव, 75 years Independent या निमित्त ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार आहे. आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविला जाणे ही अभिमानास्पद बाब असेल. असे पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आले.

महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढावी या हेतूने केंद्र शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान राबविण्या येत आहे तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना ही एक मानवंदना असे या जनजागृतीतून सांगण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत 13 ते 15 दरम्यान झेंडा फडकविण्याचे आहे असे ही या मेळाव्यात सांगण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत नडगिवे गांवातील सर्व राहात्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन नडगिवे ग्रामपंचयतद्वारे करण्यात आलेले आहे या बाबत जागृत करण्यात आले. ध्वजारोहणा बाबतचे नियमा बाबत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी श्री.वसीम सय्यद यांनी सभेत उपस्थित लोकांना प्रतिपादन केले.

या प्रसंगी नडगीवे सरपंच श्री.अमित मांजरेकर, श्री.ए.जे.कांबळे, श्रीमती तन्वी मांजरेकर आदी 23 ग्रामस्थ उपस्थित होते. जनजागृती उपक्रमात ग्रामपंचायत परीसर स्वच्छ करण्यात आले.

या जनजागृतीत अदिती भालेकर, साक्षी भालेकर, सिध्दी राणे, मयूरी पवार, प्राजक्ता गाडे, अमृता जगताप, आरती पवार, रेणुका मोरे, मयूर मोरे, चेतन मांजरेकर, जिग्नेश वारंगे, पृथ्वीक सावंत, पुष्पसेन निग्रे, यश राऊत, हेमंत पवार, अपूर्व कोवळे, सायली रांबाडे, अर्पिता राऊत, तुषार पगारे, अभिषेक गुंड्ये, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.या पथनाट्याचे दिग्दर्शन विद्यार्थी प्रतिनिधी भक्ती पिसे व गुरुनाथ भोसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!