*कोकण Express*
*सहकार चळवळ वृदिंगत व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे नियोजन : जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी*
*100 टक्के वसुली केलेल्या संस्थांचा करण्यात आला गौरव*
*वेंगुर्ले ः प्रतिनीधी*
शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा गौरव करत असताना सर्वच संस्थांनी तसे प्रयत्न करावेत. या उद्देशाने तसेच तालुक्यातील सहकारातील सर्व मंडळी एकत्र येऊन सहकार चळवळ वृदिंगत व्हावी म्हणून यावर्षी पासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे नियोजन केले, आणि याचा शुभारंभ आज वेंगुर्ले येथून होत आहे.आजवरच्या इतिहासात प्रथमच वेंगुर्लेला जिल्हा बॅके अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे या तालुक्याला निश्चितच झूकते माप देण्यात येईल. मात्र विकास संस्थानी कर्ज वाटप व वसुली अशा सर्वच बाबतीत आघाडीवर राहावे असे आवाहन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ले येथील साई डीलक्स सभागृहात बुधवारी प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला. यावेळी मनिष दळवी बोलत होते. मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेच्या माजी संचालक सौ. प्रज्ञा परब, जिल्हा बॅकेचे कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, क्षेत्रवसुली सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, कर्ज विभाग प्रमुख श्री. वरक, संगणकसंस्था प्रमुख श्री.हडकर, तालुका विकास अधिकारी भागेश बागायतकर, विकास अधिकारी दत्तात्रय आजगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी 30 जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची 100 टक्के वसुली केल्याबद्दल क्षेत्रपालेश्वर विकास संस्थेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष नारायण पार्सेकर, सचिव राजबा रमाकांत सावंत यांचा सत्कार अनिरुध्द देसाई यांच्या हस्ते तर रेडी ग्रामविकास संस्थेच्या चेअरमन चित्रा मोहन कनयाळकर, उपाध्यक्ष नुतन नकुल मांजरेकर, सचिव सदानंद नाईक, दाभोली विकास संस्थेचे चेअरमन उदय गोवेकर, उपाध्यक्ष विवेक शंकर परब, सचिव मनोहर नाईक, उभादंडा विकास संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण गावस्कर, उपाध्यक्ष पेडणेकर व सदस्य याचा सत्कार मनिष दळवी याच्या हस्ते करण्यात आला. तसेच 100 टक्केच्या जवळपास पोहोचलेल्या पाल विकास संस्था, मातोंड विकास संस्था, सातेरी विकास संस्था, केळुस विकास संस्था, म्हापण विकास संस्था व वेंगुर्ले ग्रृप विकास संस्था या सहा विकास संस्थाचे चेअरमन, उपाध्यक्ष, व सचिव व संचालक याचाहि गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मनिष दळवी पुढे म्हणाले की, जिल्हाभरात 91 तर वेंगुर्लेत 4 संस्थानी 100 टक्के वसुली केली. विकाससंस्थाच्या उलाढालीमध्ये वेंगुर्ले तालुक्याचा नंबर हा सातवा लागतो. जिल्हयातील जास्तीतजास्त संस्थानी आपली वसुली हि 100 टक्के करावी यासाठी त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क साघून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करता यावी यासाठी जिल्हयातील शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थाचा एकत्रित सत्कार समारंभ न ठेवता या वर्षी पासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे ठरले आहे. त्याचा शुभारंभ आज वेंगुर्लेत होत आहे. विकास संस्था या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे त्यामाध्यमातून आपण शेतकऱ्यांना विविध सेवासुविधा उपलब्ध करुन देवू शकतो. विकास संस्थानी त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विकास संस्थानी फक्त पीक कर्जे शेतकरी यांना न देता अल्प, मध्यम मूदतीची कर्जे देवून त्यातून आपले उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी अल्प मूदत, मध्यम मूदत कर्ज योजना विषयी माहिती दिली. तसेच खावटी कर्जा संदर्भातही वस्तूस्थिती स्पष्ट केली.
सुरुवातीस बॅकेच्या संचालक प्रज्ञा परब यानी वेंगुर्लेतील अडचणीत सापडलेल्या संस्थाना उभारी देण्यासाठी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यानी लक्ष द्यावे अशी विनंती केली. तर रेडी विकास संस्थेच्या चेअरमन चित्रा कनयाळकर यानी संस्थाना कमी प्रमाणात मार्जिन मिळत असल्याने संस्था डबघाईस आल्या असल्याने मार्जिन वाढवून मिळावे अशी मागणी केली. शेवटी अनिरुद्ध देसाई यांनी आभार मानले.