वॉटर स्पोर्ट व्यवसाय चालू करण्याकरिता झालेली कलेक्टर ऑर्डर ही स्थानिक सत्तारूढ पक्षाचे अपयशी राजकारण नव्हे काय?

वॉटर स्पोर्ट व्यवसाय चालू करण्याकरिता झालेली कलेक्टर ऑर्डर ही स्थानिक सत्तारूढ पक्षाचे अपयशी राजकारण नव्हे काय?

*कोकण Express*

*वॉटर स्पोर्ट व्यवसाय चालू करण्याकरिता झालेली कलेक्टर ऑर्डर ही स्थानिक सत्तारूढ पक्षाचे अपयशी राजकारण नव्हे काय?*

*कोरोना काळात अनंत अडचणींना तोंड देत मालवण मधील समस्त व्यावसायिक पुनध स्थगितीने गेले भांबावून!!*

*वॉटर स्पोर्ट स्थगितीच्या निमिताने तिघाडीतील अंतर्गत वाद चाहाट्यावर सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत*

*मालवण ः प्रतिनिधी*

घराणे शहांच्या कार्यकर्त्यांनी आतातरी डोळ्यात अंजन घालून घावे आणि मार्ग बदलावा. सत्तेच्या लालसेपोटी आणि घराणेशहांच्या अंतर्गत कसरतीवर जन्माला आलेले तिघाडी सरकार वर्षपूर्तचि उसासे टाकत आहे. आणि कोरोना पेक्षाही घातक अशा शासन निर्णयांनी जनता मात्र मेटाकुटीला आली आहे. वॉटर स्पोर्ट (जलक्रीडा) व्यवसायाला कलेक्टर ऑर्डरने चालू करतून टाळ्या मिळवलेल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी नेमके काय साध्य केल हे त्यांनाच ठावुक मात्र कोरोना काळात अनंत अडचणींना तोंड देत मालवण मधील समस्त व्यावसायिक पुनः स्थगितीने भांबावून गेले आहेत. पर्यटना सारख्या अत्यंत संवेदनशील व्यवसापाला असे धक्के कसे बरं सहन होऊ शकतात? एकतर मालवण मधील पर्यटकांमध्ये दरवर्षसारखा उत्साह अजूनही दिसून येत नाहीय. कारण स्पष्ट आहे की मनोरंजना सारख्या चैनिच्या क्षेत्रात पैसा टाकताना “कोविडचा धडा” नक्कीच आठवत आहे. असे असून देखीत जे काही पर्यटक आज मालवणच्या दिशेने येत आहेत त्यांना उत्सुकता होती ती वॉटर स्पोर्टची, याचा अनुभव पर्यटनाला हिरवा कंदील मिळल्यावरही येणारी पर्यटकांची रोलवलेती संख्याव सांगत होती मात्र वॉटर स्पोर्ट मध्ये पर्यटकांना आपल्या दिशेने वळते करण्यावी जादू आहे ही पर्यटकांच्या संख्येत झालेल्या वादीने अधोरेखित होत आहे. दरम्यान जलक्रिडा बंदच्या निमित्ताने ५ डिसेंबरला आक्रमक झालेले समस्त व्यावसायिक ६ तारीखच्या रात्री मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक सत्तारूढ नेत्यांना मनातल्या मनात लाखोली वहात त्यांना मंत्री महोदयांच्या भेटीला रवाना व्हावेच लागले किंबहुना आर्थिक विवंचना, कुटुंब, मागे लागलेल्या बैंका त्यांना कसे बरं शांत बसू दैतील? स्वतः च्या हिमतीवर उभारलेले व्यवसायाला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्यासाठी त्यांना समस्त खात्याच्या मंत्र्यांची मनधरणी करण्या करिता मंत्रालय गाठावे लागले ही त्यांची अपरिहार्यता होती. आता यातील गोम समजून घेताना लक्षात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!