*कोकण Express*
*अहंकारामुळेच मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले;; भाजपा नेते शेलार*
*हरलेल्या मानसिक ते मधून शरद पवार,ममता बॅनर्जी यांची वक्तव्य*
स्वतःच्या अहंकारापोटी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केंद्र सरकारच्या योजना आणि विकास कामे राबविण्यात अडथळाच आणला. ठाकरे सरकार असताना असे असंख्य प्रकल्प रखडविले. जनतेच्या विकासापेक्षा ठाकरे म्हणून माझा अहंकार मोठा आहे हेच उद्धव ठाकरे यांनी पडद्याआडून सातत्याने दाखवून दिले. त्याचाच एक परिणाम म्हणून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपेक्षित पद्धतीने झाले नाही आणि त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही. आता डबल इंजिनचे सरकार आहे राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार तर देशात मोदींचे सरकार आणि त्यांच्या सरकारमध्ये नारायणराव राणे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे आता या चौपदरीकरणाच्या कामाला दस पटीने पुढे घेऊन जाऊ असा विश्वास भाजपा नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघांत आम्ही भाजपा पक्ष जिंकेल अशी पायाभरणी सुरू केली आहे. त्यासाठी देशपातळीवर जो कार्यक्रम आखून दिलेला आहे. तो राबविला जात आहे. केंद्रीय मंत्री अजयकृमार मिश्रा हे २०,२१,२२ जुलै रोजी मतदार संघात येऊन बैठक घेणार आहे. त्यामुळे यापुढे हा मतदासंघ भाजपा चाच असेल असे श्री शेलार त्यांनी सांगितले.
राज्याचे मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल,याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उत्तर देतील.बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे.सरकार स्थिर आहे,विधानसभा अध्यक्ष व बहुमत सिद्ध केलं आहे.शरद पवार काय म्हणतात,ते होत नाही.कारण महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे राहणार असेही ते म्हणाले होते.आता काय झालं? हरलेल्या मानसिक ते मधून शरद पवार , ममता बॅनर्जी यांची वक्तव्य आहेत. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व भाजपा यांची दिलजमाई झाली आहे.कोणाला पालकमंत्री बनवा अगर नको बनवा,आमच्यात कसलेही मतभेद असणार नाहीत.युतीची सत्ता आली याचे आमच्या कडे जास्त महत्व आहेअसे त्यांनी सांगितले.आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेला डबल इंजिन लावून विकास करून दिलासा देऊ असा विश्वास आम.आशिष शेलार यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री मराठा समाजाचा असावा अशी मागणी केली या संदर्भात विचारले असता मराठा समाजाच्या सर्वच मागण्या हे सरकार पूर्ण करेल यात तीळमात्र शंका नसल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.