*कोकण Express*
*आमचा आमदार..आमचा अभिमान..!*
*काल,आज, आणि उद्याही उद्धवसाहेबांसोबत..!*
संकटाच्या काळात एखाद्याची साथ सोडणे ही मानवता मानली जात नाही. संकट काळात साथ देणाराच आपला सारथी असतो. ठाकरे सरकारवर आलेल्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना काल राजीनामा द्यावा लागला. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली. त्यातच निष्ठा काय असते हे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दाखवून दिले. आलेली सर्व आमिषे धुडकावून लावत उद्धवजी ठाकरे यांची साथ त्यांनी सोडली नाही. बाळासाहेबांनी उद्धवजी व आदित्य यांना सांभाळण्याच्या केलेल्या आवाहनाला देखील ते खरे उतरले.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काल राजभवनात राजीनामा देताना देखील खंबीरपणे उद्धवजींच्या पाठिशी असल्याचे आ.वैभव नाईक यांनी दाखवून दिले.