*कोकण Express*
*दीपक केसरकर यांना वाढीव सुरक्षा द्यावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आ. नाईक यांनी केली मागणी*
*पक्षांतर करताना दहशतवादाचा मुद्दा का येतो ? केसरकरांनी करावे आत्मचिंतन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दीपक केसरकर यांना वाढीव सुरक्षा द्यावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. केसरकरांना वाढीव संरक्षण देण्यास पोलीस बळ अपुरे पडले तर माझे संरक्षण काढून घ्या आणि त्यांना वाढीव संरक्षण द्यावे अशी मागणी केली असल्याचे आमदार नाईक पत्रकार परिषदेत सांगितले. केसरकरांचे पोलीस संरक्षण मुख्यमंत्री ठाकरेंनी कमी केलेले नाही. उद्भवजींबाबत बोलताना दीपक केसरकरांनी भान ठेवावे असेही आमदार नाईक म्हणाले. केसरकर यांचे कुटुंब हे आमचे कुटुंब असल्यासारखे आहे. केसरकर यांच्यावर 5 वर्षे राज्याच्या सुरक्षिततेचि जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. जेव्हा जेव्हा पक्षांतर करतात तेव्हा तेव्हा त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत धोका वाटतो. पक्षांतर करतानाच त्यांचा दहशतवादाचा मुद्दा का समोर येतो याचे आत्मचिंतन केसरकर यांनी करावे असा टोलाही आमदार नाईक यांनी लगावला.