महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई

*कोकण Express*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई ….*

*येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम होणार जमा..*

*मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

मागील वर्षी सन 2019 च्या हंगामात जुलै ते सप्टेंबर हंगामात अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होऊन बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता.तत्कालीन कालावधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने मा.राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार मदत जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार कुडाळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव काही कामचोर शासकीय कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत जिल्हा प्रशासनापर्यंत सादर न केल्याने बहुसंख्य शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेत दिवाळीपर्यंत मागील वर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याने वरिष्ठ पातळीवरून सदरची नुकसान भरपाई रक्कम मंजुर करण्यात आली असून येत्या आठवड्यात ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!