*कोकण Express
*तहसीलदार सावंतवाडी यांनी काढलेल्या नोटिसा चुकीच्या आहेत मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे*
*सावंतवाडी प्रतिनिधी*
पाच महिने साठी घरे खारी करा अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही अगोदरची नुकसान भरपाई पूरहानी आणि तोक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळाली नाही वर्षानुवर्ष या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कर भरून स्थानिक लोक राहत आहेत आणि परंतु वेळोवेळी महसूल प्रशासनाने जनतेला त्रास देण्याचा काम केलं आहे अनधिकृत घर बांधकाम म्हणून कर आकारणी केली जाते तीसुद्धा तीन हजार पासून ते दहा हजारापर्यंत सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास महसूल यंत्रणेने दिला आज संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला दोन्ही साईडला मातीचे भराव टाकून मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करून पाण्याचे प्रवाह बदलले आणि त्याच्यामुळेच या सर्व गोष्टी घडत आहेत यापूर्वीही पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला परंतु मुंबई-गोवा महामार्ग ज्यावेळी पूर्ण झाला त्या वेळापासून इन्सुली, शेरले, बांदा, निगुडे, विलवडे आदि भागामध्ये पुराचे पाणी एवढे येत नव्हते माती उत्खनन केलेल्यांना एकालाही दंड नाही मातीचा भराव टाकलेला दंड नाही परंतु घराचं बांधकाम अनधिकृत केलं म्हणून महसूल नोटिसा बजावल्या हे कुठेतरी चुकीचे आहे नदीतील वाळू उपसा करतात त्यांच्याकडून हप्ते घेतात आतापर्यंत किती मंडळ अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलीत ते तहसीलदारांनी जाहीर करावे नद्यातील गाळ काढणं, गाळ उपसा करणं महसूल यंत्रणेला जमलं नाही उलट नदितील काढलेले दगड संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाच्या हायवेवर काही ठिकाणी टाकण्यात आले याला जबाबदार कोण याचा सर्व गोष्टीचा महसूल प्रशासनाने अभ्यास करावा नंतरच पूरग्रस्तांना नोटिसा काढाव्यात नोटीसची आम्ही होळी करू असा इशारा त्यांनी प्रसिद्ध माध्यमाद्वारे दिला आहे