*कोकण Express*
*ओसरगाव तलावातील गाळ काढण्याबाबत पं. स.उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील ओसरगाव याठिकाणी असलेले तलाव पर्यटनाच्या दृष्टीने खूप म्हत्वाचे आहे. त्या दृष्टीने ओसरगाव तलाव विकसित होत आहे. राष्ट्रीय महामार्गलगत असल्याने या तलावावर पर्यटकांची तोबा गर्दी असते व पर्यटक याकडे आकर्षित होतात.
मात्र, असे असताना मार्च महिन्यापासून दरवर्षी या तलावाच्या पाण्याची पातळी कमी होते. याचा फटका आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना बसतो. पाणी टंचाईची समस्या जाणवते.
गेली अनेक वर्षे या तलावातील गाळ न काढल्याने मोठ्या प्रमाणात माती साचून पाणी साठा कमी होतो. तरी ओसरगाव तलाव ठिकाणच्या समस्यांचे निराकरण करून तेथील समस्या वेळीच मार्गी लावून हे तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करता येईल याची प्रयत्न करावेत. अशी मागणी कणकवली पंचायत समिती उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांजवळ केली आहे.