*कोकण Express*
*परजिल्ह्यातील इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी आवश्यक निकष पूर्ण करीत नसल्यास नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेस बसण्याची परवानगी देऊ नये ; श्री.वामन तर्फे*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
केवळ नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया परिक्षेस बसून सिंधुदुर्गातील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या परजिल्ह्यातील व इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी आवश्यक निकष पूर्ण करीत नसल्यास अशा विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असेल तर परिक्षेस बसण्याची परवानगी देऊ नये असे मत सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री. वामन तर्फे आणि सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर यांनी मांडले आहे. गेले काही दिवस नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसंदर्भात माध्यमातून चर्चा सुरू आहे. या संदर्भात आपले मत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाची भूमिका मांडताना वरील मत मांडले. नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेस प्रविष्ट होण्यासाठी काही निकष ठरलेले आहेत.हे निकष. परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला बंधनकारक आहे. परजिल्ह्यातील विद्यार्थी जर आवश्यक निकष पूर्ण करीत नसल्यास त्यांना परिक्षेस बसता येणार नाही. संबधित यंत्रणेने संपूर्ण चौकशी आणि पडताळणी करून कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी या संदर्भात उचित निर्णय घ्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने केली आहे.