जिवनविद्या मिशनच्या ग्रामसमृध्दी अभियानाचा कासार्डे येथे उद्या शनिवारी सकाळी १०वा. उद्घाटन : आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न

जिवनविद्या मिशनच्या ग्रामसमृध्दी अभियानाचा कासार्डे येथे उद्या शनिवारी सकाळी १०वा. उद्घाटन : आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न

*कोकण Express*

*जिवनविद्या मिशनच्या ग्रामसमृध्दी अभियानाचा कासार्डे येथे उद्या शनिवारी सकाळी १०वा. उद्घाटन : आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न*

*कासार्डे : संजय भोसले*

सदगुरु श्री वामनराव पै निर्मित जीवनविदया मिशन मुंबई यांच्यावतीने जीवनविदया फाऊंडेशन अंतर्गत महाराष्ट्राच्या विविध गावामध्ये ग्रामसमृध्दी अभियान राबविले जात आहे. या अभियानासाठी कणकवली तालुक्यातील कासार्डे गावची निवड झाली आहे. या अभियानाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वा. कासार्डे ग्रामपंचायत येथे होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला कासार्डे सरपंच बाळाराम तानवडे, उपसरपंच सुधाकर पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर, ग्रामसेवक कोलते, तलाठी गावडे, जीवनविद्या मिशन भांडुप शाखा अध्यक्ष रघुनाथ आयरे, सचिव संतोष चोरट आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जीवनविद्या मिशनकडून देण्यात आली आहे.
जीवनविदया मिशन व कासार्डे ग्रामपंचायत संयुक्तरित्या गावाच्या समृध्दीसाठी प्रयत्नशील राहणार आहेत. केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगामधून आरोग्य, शिक्षण व उपजिविका अंतर्गत शाळांमध्ये ई लर्निंग सेवा, शालेय वाचनालये, आरोग्य शिबिरे, आरोग्य विषयक सुविधा पुरविणे, घनकचरा व्यवस्थापन व रंगरंगोटीसह स्वच्छ परिसर, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कौशल्यवृध्दी करिता सुशिक्षीत बेरोजगारांना, महिलांना प्रशिक्षणाचे आयोजन करणे, मानवी मुल्यांचे प्रशिक्षण ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना देणे इ. उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी जीवनविदया मिशन ग्रामपंचायतीला सर्व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहे.
हे उपक्रम राबविण्यासाठी लागणारे तांत्रिक प्रशिक्षण जीवनविद्या मिशनच्या तज्ञ मंडळीकडून विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामसमृध्दी अभियान अंतर्गत आदर्श गाव निर्माण करणे शक्य होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!